22/04/2026
•••••• 🌏🌳 ● आज वसुंधरा दिवस ●🌳🌏 •••••
🌳दिवसेंदिवस वृक्षतोड, वाढते शहरीकरण, वसाहती वस्त्या त्यामुळे परिणामतः कमी पर्जन्यमान दुशीत वातावरण, पर्यावरण. ह्या मुळे आज प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्य:स्थितीमागील मुख्य कारण आहे. आपल्या एकुलत्या एका पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे हेच वृक्ष वेलींची काळजी घेणे, वृक्ष, जंगले यांचे संवर्धन करणे. हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उदिद्ष्ट आहे. आहे. ‘माणसाची प्रत्येक गरज पृथ्वी पूर्ण करते ; पण हवा, पाणी, जंगले यांसारख्या पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा भसाभस अविचारी वापर केल्याने आणि वाढत्या प्रदुषणाचे परिणाम दिसतच आहेत आणि हे असेच चालू राहिले तर मानवाचेच भविष्य अंध:कारमय आहे हे निश्चित ! याबाबत प्रबोधन करण्यासाठी २२ एप्रिल हा वसुंधरा दिन आपण मानतो.
🌳 एका दिवसापुरते सेल्फीयुक्त झाडे लावण्याचे फोटो टाकतो, मोकळ्या जागी माळरानी वृक्ष ही लावतो. उपक्रम छान आहे परंतु दुसऱ्या दिवशी त्याच झाडांकडे दुर्बल करतो. खर ते समाजानेच हा बोध, हा पर्जन्य तुटीचा संदेश ओळखून भविष्यात येणाऱ्या संकटांची चाहूल समजून बोध घ्यायला हवा.
खर तर शपथ घेऊ की प्रत्येक रिकाम्या जागी एक तरी झाड लावू, त्या सांभाळू. तर खऱ्या अर्थाने आपण वसुंधरेला हिरवीगार सुजलाम सुफलाम करू शकतोल'.
🌳खरे पौराणिक काळापासून संतानी झाडांचे महत्त्व पटवून दिले आहे. जगतगुरु तुकाराम महाराजांनी तर वृक्षांना आपले सोयरे म्हटले आहे
🌲संत एकनाथही म्हणतात🌲
अतिथी आलिया वृक्षापासी |
वंचतार्थु न करी त्यासी |
पत्र पुष्प फळ मूळ छायेसी |
त्वचा काष्टासी देतसे ||
तैसा वृक्ष समूह सगळा |
आर्थिया लागी सार्थक जाहला ||
.............. संत एकनाथ .
अर्थात :-
"घरी याचक आला,तर दानशूर माणूस जसे त्याला हवे ते देऊन त्याची तृप्ती करतो. तसेच हा वृक्ष मानवरुपी याचकाला पाने,फुले,फळे,मूळ,सावली,साल,लाकूड इत्यादी सर्वकाही संतुष्टपणाने देतो. तेही कोणताच आपपरभाव न ठेवता.
सर्व प्राणीमात्र झाडांच्या सावलीत विसावतात. झाडांची पाने खाऊन जनावरे जगतात,पक्षी झाडांवर घरटी बांधून राहतात.
झाडांच्या साली,मूळे,पाने यांपासून आयुर्वेदीय औषधे बनवली जातात".
🌳चला आपणही झाडे लावूया लावलेली झाडे जगवू या!...पंकज वसंत पाटील
मलकापूर जि.बुलढाणा
🌏🌳 ● 🌏 🌳