15/07/2024
संथ वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या काठावर वसलेल गाव म्हणजे सांगली.
विजापूरच्या आदिलशाहीची आणि शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याची हद्द म्हणजे सांगली.
1857 च्या स्वातंत्र्ययुद्धाची महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिल्यांदा ठिणगी पडलेल गाव म्हणजे सांगली.
संपूर्ण भारतावर दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या जुलमी इंग्रजांना पळवून लावून स्वतःचे प्रतिसरकार स्थापन करणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटलांच गाव म्हणजे सांगली.
संपूर्ण भारत फिरून देशभर नावाजलेल्या मल्लांना त्यांच्या घरात चितपट करून महाराष्ट्रातल्या पैलवानांचा धाक निर्माण करणाऱ्या काला पहाड व्यंकप्पा बुरुडांच गाव म्हणजे सांगली.
मराठी रंगभूमीचा जिथे जन्म झाला ते " नाट्यपंढरी " म्हणून प्रसिद्ध असलेलं गाव म्हणजे सांगली.
आपल्या स्वर्गीय आवाजाने जगभरातील करोडो लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गान कोकिळा लता मंगेशकरांचं गाव म्हणजे सांगली.
संस्कृतमध्ये वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणाला तोडीस तोड असं मराठीमध्ये गीतरामायण लिहिणाऱ्या ग दि माडगूळकरांच गाव म्हणजे सांगली.
संपूर्ण जगाला आपल्या लेखणीची ताकद दाखवणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच गाव म्हणजे सांगली.
अखंड महाराष्ट्राला विनोद शिकवणाऱ्या आणि गेली अडीचशे वर्षे तमाशाची लोककला जपणाऱ्या शिवा-संभा आणि काळू-बाळूचे गाव म्हणजे सांगली.
" माझ्या दाढीला जेवढे केस आहेत तेवढे मी पदवीधर घडवीन " असं म्हणून आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये लाखो पदवीधर घडवणाऱ्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटलांच गाव म्हणजे सांगली.
स्वातंत्र्य समरात इंग्रजांची गोळी अंगावर घेणाऱ्या आणि चौथी नापास असूनपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या वसंतदादा पाटलांच गाव म्हणजे सांगली.
महाराष्ट्रामध्ये सहकाराची सुरुवात करून सहकार महाराष्ट्राच्या मातीत रुजवणाऱ्या राजारामबापू पाटील आणि वसंतदादा पाटलांच गाव म्हणजे सांगली.
कर्तव्यदक्ष आणि जाण असलेला नेता म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वर्गीय आर आर पाटील आबांचा जिल्हा म्हणजे सांगली.
ज्ञानाची गंगा महाराष्ट्राच्या खेडोपाड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणाऱ्या भारती विद्यापीठाचे जनक स्वर्गीय पतंगराव कदम यांचा जिल्हा म्हणजे सांगली.
आपल्या चवीने आणि कॉलिटीमुळे नाकात बोलणाऱ्या पुणेकरांना " आमचे चितळे " म्हणायला लावणाऱ्या चितळ्यांचे गाव म्हणजे सांगली.
भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा लोखंडी नांगर तयार करून महाराष्ट्रामध्ये कोअर इंडस्ट्रीचा पाया रचणाऱ्या किर्लोस्करांच गाव म्हणजे सांगली.
महिला क्रिकेटमधील विराट कोहली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रनमशीन स्मृती मानधनाच गाव म्हणजे सांगली.
संपूर्ण भारतात आरोग्य पंढरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मिरजेचा जिल्हा सांगली.
स्वर्गातील इंद्राच्या अमरावतीलाही लाजवेल अशी सुवर्णनगरी असणाऱ्या विट्याचा जिल्हा सांगली.
हळदीची जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असणार गाव म्हणजे सांगली.
शास्त्रीय वाद्यांसाठी भारतभर प्रसिद्ध असणाऱ्या मिरजेचा जिल्हा सांगली.
संपूर्ण महाराष्ट्राचे तोंड गोड करणाऱ्या साखर कारखान्यांची राजधानी म्हणजे सांगली.
पश्चिम महाराष्ट्राच हृदय म्हणजे सांगली.
एक नंबर कॉलिटीचा बेदाणा उत्पादन करणारे ठिकाण म्हणजे सांगली.
फाउंड्री, गारमेंट, इलेक्ट्रॉनिक्स, मेडिसिन, खाद्य अशा विविध उद्योगधंद्यांनी परिपूर्ण असलेल गाव म्हणजे सांगली.
एकाच वेळी चार मंत्रीपद भूषवणारा एकमेव जिल्हा म्हणजे सांगली.
पश्चिम महाराष्ट्राचे हृदय म्हणजे सांगली.
सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक, वैचारिक पातळीवर जगाच्या नकाशावर आपला वेगळाच ठसा उमटवणाऱ्या अशा सांगलीची मी किती सांगू महती ?
शेवटी मला एकच बोलायचं आहे, " आमची सांगली लय लय लय चांगली ! "