Chakradhar Advertising Talegaon Dabhade Pune

Chakradhar Advertising Talegaon Dabhade Pune Your Publicity is Our Goal

Permanently closed.

Your Publicity is Our Goal......
Make your Business publicity by Advertising in All News Papers of Pune Via Chakradhar Advertising.......
News Paper : Sakal,Lokmat,Pudhari, Punyanagri,Loksatta,TImes of India,Maharashtra Times, Indian Express etc....

14/08/2021

HAPPY INDEPENDENCE DAY

04/06/2021

Don't make Trees rare, keep them with Care.

09/12/2020
15/11/2020
17/09/2020

शिवछत्रपतींचा मावळा नरेंद्रजी मोदी 🚩🚩

कणखर प्रशासन, वेगवान निर्णय, कोणाचाही मुलाहिजा न ठेवणारे कठोर नेतृत्व या गुणांसह शिवछत्रपतींना आपले दैवत मानून त्यांचे आचार विचार स्वीकार करून त्यावर निरंतर वाटचाल करणारा छत्रपतींचा मावळा म्हणजे नरेंद्र मोदीजी..

'कणखर नेतृत्व' आणि 'लोकशाहीप्रती बांधिलकीची' आस बाळगणाऱ्या भारतीयांपुढे २०१९ ची निवडणूक मोदी विरुद्ध सर्व अशा पद्धतीने झाली असली तरी खऱ्या अर्थाने ती विविध राज्यांच्या निवडणुकांची साखळी होती. भाजपला सत्तेवरून खेचण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आले आणि त्यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून होता..

भारतात निवडणूक जिंकणे 'खूप अवघड' आणि क्षणभंगूर' आहे. उमेदवाराला समाज, कुटुंब, महागाई, लोककल्याण, विकास, भ्रष्टाचार या सर्व चाचण्या पार कराव्या लागतात. सर्वच निवडणुकांमध्ये १० ते २० टक्के मतदार एखाद्या प्रभावी समाजातून येतात. अनेक राज्यांमध्ये 'सरकारविरोधी' लाट असते. परंतु या सर्वांवर मात करत निवडणूक रिंगणात प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभा नसून प्रत्यक्ष मोदीजीच उभे आहेत या चित्राचे जनभावनेत रूपांतर करण्यात २०१४ प्रमाणे पुन्हा एकदा मोदीजी कमालीचे यशस्वी झाले आणि त्यांच्या फेस व्हॅलू वरच एकट्या भाजपाचे ३०३ उमेदवार दणदणीत विजयी झाले..

नरेंद्र मोदीजी ही व्यक्ती, साहस, करूणा आणि विश्वासाची साकार मूर्ती आहे. भारताचे नवनिर्माण करण्याच्या तसेच त्याला जगासाठी दीपस्तंभ बनवण्याच्या विश्वासापोटी भारतीयांनी त्यांना पूर्ण बहुमताने सलग दुसऱ्यांदा आपला जनादेश दिला.. आणि मोदीजींच्या याच झंझावातामुळे स्वतःला मोठ मोठे ब्रँड समजणारे अनेकजन अक्षरशः लोकल ब्रँड झाले..

२०१४ आणि २०१९ साली जनतेने दिलेल्या स्पष्ट जनादेशाच्या जोरावर भारतीय जनतेला सार्थ अभिमान वाटावा अशी कामगिरी नरेंद्र मोदीजी यांनी केली आहे.. त्यातील खालील काही प्रमुख कामांचा उल्लेख करने क्रमप्राप्त आहे

✔️ फुटीरतावाद्यांच्या जवळपास ताब्यात गेलेलं जम्मू-काश्मीर पुन्हा भारतदेशाशी जोडलं गेलं.

✔️ अयोध्येत रामजन्मभूमीस्थळी राममंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा होऊन शेकडो वर्षांच्या अपमानाच्या खुणा पुसल्या जात आहेत.

✔️ CAA लागु झाल्यामुळे ऐतिहासिक चुकांची थोडीफार दुरुस्ती झाली व शेजारी देशांतील अल्पसंख्य हिंदूना न्याय मिळाला.

✔️ पाकिस्तानसारख्या दहशतवादी शेजारी राष्टावर दोन वेळा सर्जिकल स्ट्राईक करून धडा शिकवला गेला आणि भारत पूर्वीसारखा लेचपेचा देश नाही असा स्पष्ट संदेश जगाला गेला.

✔️ अन्यायकारक 'तिहेरी तलाक' बंद होऊन मुस्लिम महिलांना न्याय मिळाला.

✔️ कित्येक वर्षांपासून रखडलेले 'वन रँक वन पेन्शन' हे धोरण लष्करात लागू झाले.

✔️ लष्कराला अत्याधुनिक विमाने, शस्त्रास्त्रे, बुलेट प्रूफ जॅकेट्स मिळून देश संरक्षणसिद्ध झाला.

✔️ भारतातल्या प्रत्येक गावात आणि दुर्गम खेड्यांत वीज पोहोचली. तर अंदमान आणि निकोबार सारख्या बेटावर अंडर ग्राऊंड फायबर ऑप्टिक पोहोचवून शक्तिशाली इंटरनेट पोहोचविले गेले.

✔️ भारतातील कोट्यवधी गरिबांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्य विम्याचे कवच लाभले.

✔️ एकविसाव्या शतकाची गरज ओळखून नवीन शैक्षणिक धोरण आखले गेले.

✔️ खेडोपाडी स्वयंपाकासाठी चूल वापरण्याऐवजी गॅस पुरवठा सुरू झाला. सरपण जाळून धुरामुळे आरोग्याची हानी होणं बंद झालं आणि लाकुडतोडीमुळे होणारी पर्यावरणाची हानीदेखील टळली.

✔️ वस्तू व सेवा करासारखी करप्रणाली लागू होऊन एक अत्यंत महत्वाची अर्थसुधारणा यशस्वीरित्या राबवली गेली.

✔️ पंतप्रधानांच्या अविश्रांत मेहनतीमुळे व परराष्ट्रधोरणामुळे जगभरात भारताची प्रतिमा उंचावली. जगाला नेतृत्व देऊ शकेल असे एक बलशाली राष्ट्र म्हणून जग भारताकडे पाहू लागले.

✔️ २०१४ पर्यंत भारतात थैमान घालणाऱ्या दहशतवाद्यांचा, अतिरेक्यांचा बीमोड झाला.

✔️ आंतरराष्ट्रीय स्तरावर 'योग दिन' साजरा होऊ लागला व भारतीय संस्कृतीचा खजिना जगासमोर आला.

अशा अनेक गोष्टी गेल्या सहा वर्षांत केल्या गेल्या. अनेक रखडलेल्या योजना पूर्णत्वाला पोचल्या. अजूनही कितीतरी मोठा पल्ला गाठायचा आहे.

'मोदींचे विरोधक' ही एक अगदी साधी जमात आहे.. अगदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून ते आज पर्यंत विरोधक सातत्याने त्यांच्यावर टिका करतात परंतु मोदीजी त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नाहीत किंबहुना त्यांच्या कडे दुर्लक्ष करून आपली अखंड वाटचाल सुरूच ठेवतात आणि हेच त्यांचे सर्वात शक्तिशाली मोदीअस्त्र आहे..

मोदीजींची मेहनत, निष्ठा आणि देशसेवा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.. सर्वांसाठीच सदैव ते आदर्श व्यक्तिमत्व आहेत..

युगानुयुगे ज्या नेतृत्वाची वाट बघावी, असे नेतृत्व नरेंद्र मोदींच्या रूपाने नव भारताला लाभले आहे.

शिवछत्रपतींना आपले दैवत मानून त्यांचे आचार विचार आपल्या आचरणात आणून मार्गक्रमण करणाऱ्या नरेंद्रजी मोदी यांना आज सत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना त्यांच्याकडून लोककल्याणाचे कार्य निरंतर घडत राहो, देश विकासाच्या, समृद्धीच्या उंचीवर जावो, त्यांना भरपूर आयुष्य लाभो, त्यांची प्रकृती सदैव उत्तम राहो, अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना..!

- ✍ Mayur Kupade ©

Address

Pune
410506

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chakradhar Advertising Talegaon Dabhade Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Chakradhar Advertising Talegaon Dabhade Pune:

Share