19/06/2018
# शिवसेने मधील डॅशिंग नेता छगन भुजबळ १८ आमदारांना घेऊन सेने तुन बाहेर पडला - आता शिवसेना संपणार -भुजबळ गेले आत मध्ये अडीच वर्षे सडले!
# गणेश नाईक, भास्कर जाधव,सतीश प्रधान सेनेतून बाहेर पडले- आता तर शिवसेना खीळ खिळी होणार - हे तिन्ही जण नंतर राजकारणात उताणे पडले!
# नारायण राणे जास्त वळवळ करू लागले अशी चुळबुळ लक्षात येताच बाळासाहेबांनी त्यांना पक्षातून हाकलले-अरे रे ,आता शिवसेने चे काही खरे नाही-- राणेंची वन वन भटकंती सुरू झाली. काँग्रेस, भाजप असा प्रवास करता करता ते भाजप ची कठपुतली बनले.त्यांनी काढलेल्या पक्षाचे पण ते राहिले नाही.
# नंतर तर ठाकरे घराणेच फुटले --राज ठाकरे यांनी नवनिर्माण साठी नवीन पक्ष काढला . --आता काही खरे नाही. शिवसेना आता दुभंगणार. आज काय झाले? राज ठाकरे यांचा पक्षच फक्त नावा पुरता राहिला आहे. त्यातील बहुसंख्य कार्यकर्ते घरवापसी करून शिवसेनेत परतले आहे.
# बाळासाहेब ठाकरे यांनी इह लोकांचा त्याग करून स्वर्ग लोकांत ईश्वर भेटी साठी प्रयाण करताच पृथ्वीवरील दानवा नी जल्लोष साजरा केला-आता तर शिवसेनेचा आत्मा च निघून गेला.शिवसेना पुरती संपली म्हणून समजा.--पण त्या दानवा ना धोबी पछाड करीत शिवसेना आपला भगवा फडकत ताठ मानेने उभी आहे.
# २०१४ च्या विधान सभा निवडणुकी पूर्वी २५ वर्षाची मैत्री तोडून भाजपने शिवसेने शी असलेले संबंध तोडले.पण भाजप च्या नाकावर टिच्चून शिवसेने ने स्वबळावर ६३ आमदार निवडून आणले.आता २०१८ ला मात्र ज्यांनी मैत्री तोडली तेच ती मैत्री जोडण्या साठी धडपड करीत आहे.सध्या महाराष्ट्रातून तेच संपण्याच्या मार्गावर आहे.
अशा रीतीने शिवसेना संपण्याचे स्वप्न पाहणारे संपले पण बाळासाहेबांच्या अनुपस्थितीत त्यांच्या आशीर्वादाने आणि निष्ठावंत शिवसैनिकांच्या जीवावर उद्धवजींच्या समर्थ नेतृत्वाखाली शिवसेना पूर्वीच्याच गतीने यशस्वी वाटचाल करीत आहे.
१९ जून म्हणजे शिवसेनेचा स्थापना दिन! ह्याच दिवशी बाळासाहेबांनी आपल्या सवंगड्या च्या सोबतीने आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या साक्षीने शिवसेनेचा कल्प वृक्ष महाराष्ट्राच्या पवित्र मातीत लावला.त्याचीच बहुगुणी फळे आज तुम्ही आम्ही चाखत आहोत. शिवसेने च्या ५२ वर्धापन दिना निमित्त खूप खूप शुभेच्छा !