Ananya MultiTech Private Limited

Ananya MultiTech Private Limited डायनॅमिक, सोशल व व्यावसायिक मराठी वेब? Recently we have ventured in area of Marathi Websites & Android Applications...

Ananya MultiTech Private Limited is 14years old software development company having deep roots in desktop application, websites and mobile applications.

*गुंतवणूक केली खड्ड्यात गेली योजना*१. नजिकच्या भविष्यात आपल्याकडे भरपूर पैसे असतील पण प्यायला “पाणी” नसेल. आपण फार वेगान...
07/06/2024

*गुंतवणूक केली खड्ड्यात गेली योजना*

१. नजिकच्या भविष्यात आपल्याकडे भरपूर पैसे असतील पण प्यायला “पाणी” नसेल. आपण फार वेगाने ह्याकडे प्रवास करतो आहोत. कोकणासारख्या भरपूर पाऊस असलेल्या प्रदेशात देखील पाणी प्रश्न गंभीर होतो आहे. बोरवेल्स २०० फूट पेक्षा खाली जात आहेत. पहिल्या स्तरांवर १०० फूटाच्या आत मिळणारे भूजल संपत आले आहे. आणि सततची बांधकामे, रस्त्याची कामे ह्यामधे वापरले जाणारे सिमेंट, डांबर अशा गोष्टींमुळे जमीनी कडक झाल्या आहेत. ह्यामुळे पावसाळ्याचे पाणी रस्ते, गटारे, नाले ह्यावरून वहात जाऊन नदीला मिळते आणि समुद्राला. ह्याचा काहीही उपयोग नाही. कारण सारे पाणी वाहून जाते, कुठेही अडवले जात नाही. जर पाणी अडवले जात नाही तर ते जिरत नाही. अशाने भूजल परत रिचार्ज होत नाही. आपण अनेक पावसाळे असे फुकट घालवले आहेत, पण भूजल खणून खणून, शोषून शोषून वापरत आहोत.

२. ⁠पाणी जिरायला पाहिजे तर आधी ते अडवले जायला हवे आणि जमीनीचा वरचा स्तर जो कडक झालेला आहे तो फोडून त्याला जिरायला वाट दिली पाहिजे. सिमेंट, डांबरमुळे कडक झालेला हा स्तर काही फार नाही. फारतर एखाद दिड फूट आहे. पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात ठिकठिकाणी खड्डे खणले असता हे सोपे होऊ शकते. प्रत्येक खड्डा हा भूजल रिचार्ज करणारा चार्जींग पॉईंट होऊ शकतो. पण ह्यातील काही स्वयंप्रेरणेने वगैरे होणार नाही. आता करू, मग करू म्हणून आपण ते टाळत राहणार. ह्यासाठीच ही योजना आहे. आपल्यापैकी बऱ्याचा जणांची इच्छा तर असते पण प्रत्यक्ष सहभाग शक्य नसतो, अडचणी असतात. असे ह्या योजनेत सहज सहभागी होऊ शकतात.

३. पुढील आठवड्यात मी वाडी वरवडे ह्या माझा गावातील सरपंचांना भेटून एक पत्र देणार आहे आणि गावात एक मोठा बोर्ड लावणार आहे. भूजलाचे महत्व समजावून सांगणार आहे. आणि २ फूट खोल, २ फूट रूंदीचा खड्डा करणाऱ्याला ५०/- देणार आहे. १००० खड्डे अशा प्रकारे होई पर्यंत मी प्रती खड्डा ५०/- देणार आहे. हे माझे डोनेशन नाही. ही माझी गुंतवणूक आहे. ह्याचे उत्तम रिटर्न मला भावी काळात मिळणार ह्याची खात्री आहे. कदाचीत भविष्यात माझाकडे कोट्यावधी रुपये असतील पण प्यायला पाणी नसेल, त्यापेक्षा आज मी ५०००० गुंतवतो. आणि भविष्यात पाणी मिळत राहील ह्या बद्दल खात्री करतो! अशा स्वरूपाची ही योजना मी *गुंतवणूक केली खड्ड्यात गेली* ह्या नावाने सुरू करत आहे.

४. ⁠ ज्यांना सहभागी व्हायची आहे त्यांनी कृपया ह्या स्किमचा मेसेज स्वत:च्या नावाने प्रसारीत करा. कुणालाही मला, आषाढीला किंवा दुसऱ्या कुणाला पैसे द्यायचे नाहीत. नाव देखील घ्यायची गरज नाही. तुम्हाला जमतील तितक्या खड्ड्यांची जबाबदारी घ्या. ज्याने कुणी खड्डा खणला त्याला ५०/- द्या. जमतील तितके खड्डे खणून घ्या. १० - २० - १०० - १००० .. आपल्या सोसायटीला प्रवृत्त करा. आपल्या नगरसेवकाला भेटा. आपल्याला पाणी पुरवठा करणारी बोरवेल, विहीरी, तळी, बांधारे आणि सगळीकडे खड्डे खणा. पाण्याच्या स्त्रोतांजवळ खड्डे खणताना १० फूट लांबीवर खणा. ठिकठिकाणी पाणी जमीनीत जिरूदे. कोट्यावधी लिटर पाणी जिरवायचे आहे लक्षात घ्या. कराल तितके खड्डे कमी आहेत. गेल्या अनेक वर्षात जे पाणी आपण भूगर्भातून काढले आहे, त्याचा परतावा आपल्याला करायचा आहे. आणि ही गुंतवणूक आहे. आपल्याला परत अनेक वर्षे उपयोगी पडणार आहे.

५. ⁠पावसाळा अखेरीस ह्या खड्ड्यांमधे भरपूर मूळसांभार असलेले एक मोठे झाड आपल्याला लावायचे आहे. ज्यांना महावृक्ष म्हणतात अशी झाडे जसे की आंबा, फणस, वड, पिंपळ, औदुंबर, चिंच. ह्यांची मुळे जमीनीत खोलवर आणि दूरवर पसरत राहतात, जमीन भुसभुशीत ठेवतात आणि लाखो लिटर पाणी दरवर्षी जमीनीत मुरवत राहतात. हे वृक्ष भूजलाचे कायम स्वरूपी चार्जींग पॉईंट असतात.

मी आजवर जेव्हा जेव्हा काही कल्पना मांडली आहे तेव्हा तुम्ही मला नेहमीच सपोर्ट केला आहे. आजदेखील मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. हा मेसेज प्रचंड व्हायरल करायला मला मदत करा. अधिकाधिक लोकांपर्यंत पोचूया. लाखो खड्डे मारूया. कोट्यावधी लिटर पाणी मुरवूया. ही संधी परत ८ महिन्यांनी येणार हे विसरू नका. हा मॉन्सून खूप चांगला आहे, पुढचा कसा असेल माहित नाही.

*चला खड्ड्यात पैसे घालूया!*

आषाढी व्हेंचर्स - Aashadhi Ventures तर्फे मी पार्टिसिपेट करतो आहे. अजून कोण कोण येतंय?
01/06/2024

आषाढी व्हेंचर्स - Aashadhi Ventures तर्फे मी पार्टिसिपेट करतो आहे. अजून कोण कोण येतंय?

ऑनेस्ट : द ऑईल स्टोरीराधा आज खूप खूष होती! बरेच वर्षांनी मोठ्ठी सुट्टी सँक्शन झाली होती. ‘आजोळी जाऊन तर कितीतरी वर्षे झा...
21/05/2024

ऑनेस्ट : द ऑईल स्टोरी

राधा आज खूप खूष होती! बरेच वर्षांनी मोठ्ठी सुट्टी सँक्शन झाली होती. ‘आजोळी जाऊन तर कितीतरी वर्षे झाली. आता फारसे आठवतही नाही. लास्ट इअरला असताना शेवटची गेले होते', राधाच्या मनात अनेक वर्षांचा इतिहास घोळत होता. कधी त्या आठवणींच्या गल्लीबोळात हरवत १४ वर्षे मागे गेली कळलेच नाही...

"मामाची शेती म्हणजे पारंपारीकता आणि आधुनिकतेचा अनोखा संगमच. 'घरी खातो ते आपणच पिकवायचे' हा पणजोबांचा दंडक मामा आजही कसोशीने पाळत असे. अजूनही सर्व भावंडांना घरचे तांदूळ, हरभरे, चवळी तो आवर्जून पाठवतो. पण केवळ पारंपारीक समजूती कवटाळून न बसता आवश्यक तिकडे ट्रॅक्टर, ड्रिप सारखे आधुनिक तंत्रानाची कास धरत त्याने उत्तम समतोल साधला आहे.” ...
.. "शिरीष देखील मामाच्या पठडीत छान तयार झालेला आहे. मामाच्या पिढ्यानुपिढ्यांच्या अनुभवाला त्याने आपल्या बिएससी एग्रीच्या शिक्षणाची जोड देत अनेक बदल कालानुरूप केले आहेत. त्याच्या इमेल्स आणि व्हिडीओकॉल्समधून सारे अपडेट्स मिळत असतात!”...

"अगं आई तुझा बॅगा भरून झाल्या का? उशीर होतोय".. रमाची हाक आली आणि राधा भानावर आली. रमा देखील खूप एक्सायटेड होती 'मामाच्या गावाला' जायचे म्हणून. रमाच्या वडीलांना गावच नाही. त्यांचे वडीलच शहरात स्थलांतरीत झाल्याने रमाच्या वडीलांचे सारे लहानपण गेले शहरात. इंजिनिअरींग नोकरी सारे शहरात. लग्नानंतर पिकनीक्स आणि प्रवास खूप झाले. पण रमाला गाव म्हणजे काय ते फारसे कधी अनुभवायलाच मिळाले नाही. वडीलांचे आयटी इंजीनिअरचे करीअर आणि आई आंतरराष्ट्रीय रिफाईंड तेलाच्या कंपनीत सिनीअर फूड टेक्नॉलॉजिस्ट ह्या भोवतीचे रमाचे लहानपण घुटमळत राहीले होते. खरेतर केवळ ३५० मैलावर असलेले आजोळ, पण हे अंतर ओलांडायला तिच्या वयाची १४ वर्षे लागली होती..

गावोगावच्या सीमा ओलांडताना हळूहळू बदलत जाणारी भाषा, संस्कृती ती अनुभवत होती. महाराष्ट्रात आल्यावर तर तिला मराठी शब्द कानावर पडल्यावर मजाच वाटली. घरी आई-बाबांची ही सिक्रेट भाषा असल्यासारखी होती. बरेचवेळा तिला ते काय बोलतात हे कळतच नसे. इंग्रजी शाळा, दाक्षीणात्य सहकारी ह्यामुळे मराठी, मातृभाषा असुनही तिला परकीच होती. आता तर रेडीओवर देखील FM मराठीत होते! ज्वारीची भाकरी तिने पहिल्यांदाच खाल्ली. ज्वारीची भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी हे कॉम्बिनेशनच तिला खूप आवडले. यथावकाश ते मामाच्या गावी पोचले. ८ तासांचा प्रवास पण त्या उत्साहात अगदी छान पार पडला..

घरी गेल्याबरोबर पहिल्यांदाच आलेल्या भाचीचा काय पाहूणचार विचारू नका. मामी आणि आजीचा उत्साह - आनंद तर गगनात मावत नव्हता. शेतातला ताजा हुर्डा काय, पोपटी काय, बागेतली फ्रेश फळे काय. धमाल चालू होती. सकाळी गायींना चरायला सोडायचे, भरपूर नाष्ता करायचा, मोकळ्या माळावर फिरायला जायचे, सायकल चालवायची, तळ्यावर आंघोळ करायची आणि उन वर आले की जेवायला घरी यायचे असा मस्त कार्यक्रम होता. गावाकडची संध्याकाळ तर खूपच छान. थंडी पडायची. शेकोट्या पेटायच्या. शेकोटीवर कणसे भाजून खायची. मग गप्पांचा फड लागायचा...

“अरे तेल संपायला आलेय, शेठच्या घाण्यावरून घेऊन ये”, मामी म्हणाली

“कुठले तेल वापरता तुम्ही? माझा कंपनीने हल्लीच राईस ब्रान तेल आणलेय. एकदम हलके, दर्जेदार आणि आरोग्यवर्धक” .. “हृदयासाठी तर एक नंबर!”, राधा सांगत होती..

“कायपण काय ताई? अगं तांदळाच्या ब्रानमधे तेल ते किती? ८-१०%. किती तांदूळ पिकतो देशात? देशभरातील सारा ब्रान एकत्र करून जितके तेल निघणार नाही त्याच्या हजारो पटीने राईसब्रान तेल हे बाजारात विकत आहेत", इती शिरीष ...
.. आणि राधा एकदम भानावर आली. स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या 'तेलाच्या खरेदीचे ऑर्डरबुक्सच' तिच्या डोळ्यासमोरून झर्रकन गेले. त्यात पाम तेल, मिनरल तेल, एक्सपायर झालेले तेल, प्राण्यांची चरबी असे सर्व काही असायचे. मग हे सारे तेल ३००-४०० डिग्री पर्यंत तापवले जायचे जेणे करून ते एकमेकांत चांगले मिसळले जाई. मग त्यावर हेक्झेन सारख्या केमिकलच्या प्रक्रीया, त्याचे वास-रंग काढून टाकायला ब्लिचींग असे अनेक प्रकार केले जात. मग "रिफाईंड तेल" नावाचा एक तरल पदार्थ तयार होत असे. मग त्यामधे हवा तो एसेंस मिसळला की झाले हवे ते तेल. राईस ब्रान हवे तर तो एसेंस, शेंगदाणा हवे तर तो एसेंस. मूळ केमीकल तेच! आणि मग हे कसे हलके, आरोग्यदायी हे पटवून द्यायला सेलीब्रिटींना घेऊन जाहिरातींचा भडीमार...

राधा तर ह्या सर्व प्रकरणांचा भागच होती. ॲड आणि सेल्स डिपार्टमेंट सोडले तर बहुतेक सर्वच विभाग आणि प्रक्रीयांशी तिचा संबंध होता. पण राधा केवळ करीअरसाठी भुकेलेली प्रोफेशनल नव्हती. अत्यंत स्टुडीअस अशा राधाने प्रचंड अभ्यास करून तिचे करीअर साकारले होते. मोठ्या मेहनतीने ही पोस्ट मिळवली होती आणि प्रचंड स्पर्धेला तोंड देत ती टिकवली होती. “शिऱ्या तुझे म्हणणे जरी खरे असले तरी प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानामागे एक खोल विचार असतो, संशोधन असते. चला काहीतरी खराब वस्तू विकून लोकांना फसवूया अशा प्रकारे कुणी प्रॉडक्ट बनवत नाही की संशोधन करत नाही"

“पूर्वी गावोगावी तेलाचे घाणे होते. लोक आपापल्या शेतात पिकणाऱ्या तेलबिया घेऊन जात व फ्रेश तेल गाळून आणत. अधिकचे तेल इतरांना विकले जात होते. पण जसे शहरीकरण वाढीस लागले तसे मोठ्या प्रमाणात गाव खेड्यातून लोक शहरात स्थलांतरीत झाले. छोट्या छोट्या शहरात मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढली. तिथे वसणाऱ्या माणासांची व्यस्तता गावातील लोकांपेक्षा खूप जास्त होती. त्यामुळे "पॅकेज" केलेल्या जीवनावश्यक वस्तूंचा वापर वाढला. तेलातील आर्द्रतेसारख्या घटकांमुळे तेल पटापट खराब होत असे. त्यामुळे तेलावर प्रक्रीया आवश्यक होती. शिवाय विवीध प्रकारची तेले वेगवेगळी उपलब्ध करणे हे देखील एक आव्हान होते. ह्याहून पुढील आव्हान होते त्याच्या किमती. ह्यासाठी तेलावरील विवीध प्रक्रीया करून त्याचे 'रिफाईंड' हे नविन स्वरूप साकारले गेले. हे तेल दीर्घकाळ खराब होत नसे, वारंवार तळणासाठी वापरले तरी काळे पडत नसे.” ...

“मोठ्या प्रमाणावर जेव्हा आपण एखादी गोष्ट बाजारात आणतो तेव्हा ती जबाबदारी देखील असते. घाण्याच्या तेलाच्या कच्च्या मालाची क्वालिटी बदलली की लगेच त्याचा रंग आणि चव बदलत असे. पण रिफाईंड तेल कितीही मोठ्या प्रमाणात, कुठल्याही बॅचचे घेतले तरी त्याचा रंग, चव व गुणधर्म कधीच बदलत नाही. वर्षानूवर्षे हा एकसमान दर्जा सातत्याने टिकवणे हे खरेच एक मोठे आव्हान आहे जे रिफाईंड तेला इंडस्ट्रीने लिलया पेलले!” ...

“अगं हे जरी खरे असले तरी मुळात जे तेल म्हणून आपण जे वापरतो ते तेलच नसेल तर काय? एकसमानता म्हणजे uniformity ला जितके महत्व आहे तितकेच महत्व 'कच्च्या मालाच्या खात्रीला' म्हणजे conformity ला आहे ना. जे तेल मी शेंगदाणा तेल म्हणून खातोय ते नसेलच शेंगदाणा तेल तर? त्यात ६०% पर्यंत दुसरेच काहीतरी मिक्स केलेले असेल तर? आणि सगळ्यात वाईट म्हणजे ती भेसळ प्रामाणीकपणे कबूलही केलेली नाही. मला शुद्ध शेंगदाणा तेल म्हणून भेसळ केलेले केमिकल विकत असतील तर ही फसवणूक नाही का?”, शिरीषने एकाच मुद्यात राधाला निरूत्तर केले होते. “ह्या अनेक तेलांच्या भेसळीला 'एकसमानता' मिळवून देण्यासाठी त्याला मोठ्या प्रमाणात तापवतात, त्यात जे केमिकल घालतात आणि ज्या प्रकारे त्याचे मूळ गुणधर्म बदलतात त्याच्या शरीरावर होणाऱ्या दुष्परीणामांचे काय? साध्या सांधेदुखी पासून सुरूवात होऊन हळूहळू बिपी, शुगर, हार्ट, कॅन्सर सारख्या अनेक आजारांना ह्यामुळेच सबळ कारण मिळते हे तथ्य नाकारता येत नाही ना?”

"रिफाइंड तेलाच्या माध्यामातून आपण रोज स्लो पॉयझनला बळी पडतो आहोत”... राधाचा चेहरा पडला होता. तिच्याकडे डिफेंसला शब्दच नव्हते. खरेच तर बोलत होता शिऱ्या. आणि शहरीकरणाच्या अपरीहार्यतेमुळे आपण हे वर्षानुवर्षे सहन करतोय हे देखील तिला जाणवत होते...

“चल मला पण बरीच वर्षे झाली घाण्याचे तेल पाहून. मी पण येते तुझा सोबत", राधा म्हणाली.

“मी पण, मी पण", रमाने देखील उडी मारली..

तिघेही घाण्यावर जायला निघाले. वाटेत शिरीष राधाला लाकडी घाण्याचे तेल आणि त्याचे आरोग्यवर्धक फायदे सांगत होता. पूर्वी त्यांच्या गावात लोखंडी घाणे होते. पण बरेच वर्षे रिफाईंड तेलामुळे पारंपारीक तेलघाणे भंगारमधे विकले गेले. गेल्याच वर्षी गावात नविन लाकडी घाणा आला होता. आणि तेलाची क्वालिटी खूपच छान होती. लोखंडी घाण्याच्या कोल्डप्रेस ऑईलपेक्षा हे तेल थोडे महाग होते पण त्याचा अरोमा खूप छान होता. लाकडी घाण्यामुळे तेल गाळले जाताना करपत नसे. त्यातील सात्विक गुणधर्म तसेच रहायचे...

दुकानात पोचताच रमाची पहिली प्रतिक्रीया, “शी, हे किती गढूळ दिसते. त्यापेक्षा आईच्या कंपनीचे तेल किती छान पारदर्शक, सोनेरी असते" ...

“अगं ते १००% नैसर्गिक आहे ना. ते गढूळ असणे हीच त्याच्या शुद्धतेची परीक्षा आहे!”, दुकानदार काका हसत म्हणाले. राधा काही म्हणाली नाही पण दुकानातील अस्वच्छपणा, कामगारांचा गलीच्छपणा, घाण्याची अवस्था आणि तेलातील गाळ तिच्या देखील मनात काहूर माजवत होते. परत येत असताना ती शिरीषला म्हणाली, “शिऱ्या, घाण्याच्या तेलाचे '१००% नैसर्गिक' हे जरी खरे असले तरी त्यातील गढूळपणा आणि अस्वच्छता आपण कसे दुर्लक्षीत करू शकतो?”. त्यावर शिरीष म्हणाला, “अगं नैसर्गिक जे काही असते ते नेहमीच आरोग्यासाठी उत्तम असते. त्यावर प्रक्रीया करून तुम्ही ते शुद्ध, पारदर्शक वगैरे करायला जाता तेव्हाच खरा गोंधळ चालू होतो"..

“अरे मामा, नैसर्गिक म्हणून आपण केळे सालासकट खातो का? डाळींबातील बिया खातो का? नैसर्गिक ते सारेच खाण्यायोग्य असे कधीच नसते.”, रमाने मधे नाक खुपसलेच. “मी नाही ह्या तेलातले कुठले पदार्थ खाणार मामा. चिखलात तळल्यासारखे वाटेल ... इईइईइई".. तिच्या डोक्यातून काही केल्या तो गढूळपणा जात नव्हता!

“शिऱ्या, आजोबा सांगायचे ना, तसे आपल्याला सुवर्णमध्य गाठता यायला हवा. रिफाईंड वाइट ह्या बद्दल आता मनात शंका नाही. पण केवळ '१००% नैसर्गिक' म्हणून कुणी आपल्या गळ्यात गढूळ, घाणेरडे काही मारत असेल तर कसे चालेल? तिथे जे लोक काम करत आहेत त्यांच्या आरोग्याचे, स्वच्छतेचे काय? एक मावशी तिकडे तेल भरताना खोकत होती आणि परत त्याच हाताने तेल भरत होती. ते देखील नरसाळ्यातून. हल्लीच आपण कोरोना सारख्या भयावह प्रकरणातून कुठे सावरतोय. अशा अस्वच्छतेमुळे, गलीच्छपणामुळे जो संसर्ग होऊ शकतो ह्याची कल्पना तरी केली आहे का? आणि हे सारे आपण महाग तेल विकत घेऊन करतोय. जणू दुखणे विकत घेतोय की काय!”, इती राधा.

शिरीष म्हणाला, “अगं सुरूवातीला त्याने कापडाच्या फिल्टरमधे ते फिल्टर करायचा प्रयत्न केलेला. पण तो गाळ जो आहे तो तेलातच आहे. तो नाही सहजपणे निघत. आणि तो कपडा पण इतका चिकट होतो की सहजपणे धुतला जात नाही. मग त्याने तसेच विकायला सुरूवात केली.” ... “पण तिथे असलेल्या कामगारांच्या आरोग्याचा, अस्वच्छपणाचा आणि संसर्गाचा मुद्दा मात्र योग्यच आहे. पण करणार तरी काय ना? घरी आणून जरी आपण फिल्टर केले तरी सगळा गाळ जाणार नाही आणि जंतूसंसर्ग तर राहणारच!”

राधा म्हणाली, “करणार काय हा वेगळा विषय! एकदा आपण काय चूक करतोय हे कळले आणि काय साध्य करायचे आहे हे लक्षात आले की ते करायचे कसे हे तितकेही कठीण नसते. सोशल मीडियाचा जसा जवळच्या लोकांच्या संपर्कात रहाण्यासाठी फायदा होतो तसाच अनेक प्रयोगशील, उद्यमशील लोकांशी ओळख देखील होते. काही महिन्यापूर्वी माझी एका अशाच समूहाशी ओळख झाली जे 'कोरा' नावाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रीय आहेत. कोरावरील काही धडपड्या मराठी लोकांनी मिळून 'आषाढी व्हेंचर्स' नावाची एक संस्था चालू केली आहे. तिथे ते अशा वेगळ्या विषयांवर काम करतात. आपण त्यांच्यासमोर हा विषय मांडूया. बघू काय होते"...

मग तो विषय आला 'आषाढी व्हेंचर्स' च्या प्लॅटफॉर्मवर. बघता बघता ३० जण एकत्र आले आणि लाकडी घाण्याचे परंतू 'विश्वासार्ह' तेल कसे बनवायचे ह्या विषयावर काम चालू झाले. कुठलेही केमीकल वापरायचे नाही, तापमान द्यायचे नाही हे तर आषाढीअन्सच्या डिएनएमधेच आहे जणू. त्यामुळे तेलाच्या शुद्धीकरणावर काम चालू झाले. कपड्याचे किंवा स्क्रीनचे फिल्टर फारसे परीणामकारक नव्हते. आणि गाळाचे तेलाशी बॉण्डिंग खूप घट्ट होते. त्यामुळे ते सहज फिल्टर होत नसे. त्यातील एकाचा आयुर्वेदातील अनुभव कामी आला. आयुर्वेदात काही काढ्यांचे शुद्धीकरण करून एकदम तरल काढा मिळवायचा असेल तर सेंट्रीफ्यूज पंप वापरतात. मग अशा प्रकारचा एक विशेष सेंट्रीफ्यूज पंप डिझाईन करून त्यावर प्रयोग केले. तेव्हा साधारण ५-६% गाळ वेगळा झाला. मग ही प्रक्रीया अजून परफेक्ट करण्याकडे बराच वेळ गेला. त्या दरम्यान तेल निर्जंतूक व्हावे ह्यासाथी नैसर्गिक रित्या काय करता येईल ह्यावर देखील काम चालू होते. त्यावर पर्याय निघाला समुद्री मिठाचा. अशा प्रकारे तेलातील अनावश्यक गाळ काढून, जंतू संसर्ग काढून नैसर्गिक पण दर्जेदार तेल तयार झाले. ह्यावर चांदीचे फिल्टर वापरून ॲक्टीवेशन केले गेले. चांदीच्या संपर्कात आलेली गोष्टीला रजोगुण प्राप्त होतो जो शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. अशा प्रकारे तयार झाले नैसर्गिक, कुठलेही केमीकल न वापरता शुद्ध आणि निर्जंतूक केलेले आणि चांदीने प्रभावीत केलेले दर्जेदार तेल!

मग प्रश्न होता, ह्याला नाव काय द्यायचे? तर ज्या मुद्यावर ह्या प्रोजेक्टची रचना झाली तो म्हणजे 'विश्वासार्हता' आणि 'खरेपणा'. म्हणून नाव ठेवले 'ऑनेस्ट' आणि ही आहे ऑनेस्ट ऑईल स्टोरी!

रामनवमीच्या शुभमुहूर्तावर ऑनेस्ट ऑईल मार्केटमधे सादर झाले. चांगला रिस्पॉन्स आहे. तुम्ही देखील नक्की वापरून पहा. आणि तुमचा अनुभवदेखील आमच्या बरोबर शेअर करा. आम्ही नवीन राधा, शिरीष, रमा शोधतच आहोत. जे आम्हाला असे व्यापक प्रोजेक्ट करायच्या संधी देतील!

आम्ही आहोत आषाढी! सोशल मीडियावरील अनोळखी पण उद्यमशील लोकांनी चालू केलेली लिडरलेस वारी! आणि ही वारी सर्वांसाठी खुली आहे. अविरत आहे..

https://aashadhi.com/
https://aashadhi.com/product/honest-groundnut-oil/

आमचा व्हाट्सॕॅप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/LcGy8TIvPsn7cL2P5k77si

सिंधुदूर्ग जिल्ह्याचा पहिलाच ऑनलाइन वेब-न्युजपेपर : "कोकण नाऊ : चॅनेल आपल्या हक्काचे". डायनॅमिक Wordpress CMS वापरून बनव...
01/12/2017

सिंधुदूर्ग जिल्ह्याचा पहिलाच ऑनलाइन वेब-न्युजपेपर : "कोकण नाऊ : चॅनेल आपल्या हक्काचे". डायनॅमिक Wordpress CMS वापरून बनवलेली अत्याधुनिक वेबसाइट. कस्टम ऍड बॅनर, ठळक घडामोडी, न्युज स्लायडर, लोकप्रिय बातम्या, विविध सेक्शन, युट्युब व्हिडीओ चे अपडेटेड लिंकींग, ब्राऊजर नोटिफिकेशन्स, डायनॅमिक न्युजलेटर, स्पॅम प्रोटेक्शन सहीत ओपन रजिस्ट्रेशन, क्राऊडसोर्सींग, संबंधीत बातम्या, अभिप्राय सारखे अत्याधुनिक व डायनॅमिक फिचर्स. ९ दिवसात जुनी साइट टेकओव्हर करून नविन साइट अत्याधुनिक स्वरूपात प्रस्थापित. लवकरच ऍन्ड्रॉइड मोबाइल ऍप. कोकणातील स्वत:चे अॅप असलेली पहिलीच न्युज वाहिनी. पहा व आजच रजिस्टर करा ..

http://kokannow.com

1st Dynamic Online Newspaper of Sindhudurg District : KokanNow! Developed using dynamic wordpress CMS with custom local ad banners, breaking news, news post slider, youtube video linking, browser notifications, dynamic newsletter, spam protected open registration for crowd sourcing and commenting and many such features loaded with perfection. Check now and stay tuned! Contact us if you need any such service..

पुनश्च डिजीटल नियतकालीकाचे ऍन्ड्रॉइड मोबाइल ऍप...https://play.google.com/store/apps/details?id=com.punashcha.cordova Cor...
29/10/2017

पुनश्च डिजीटल नियतकालीकाचे ऍन्ड्रॉइड मोबाइल ऍप...
https://play.google.com/store/apps/details?id=com.punashcha.cordova

Cordova based platform independent, portable mobile app for wordpress based websites to present content in fashionable manner with categories & interaction. Large image sharing on social media included..

मराठी भाषेत असंख्य छापील नियतकालीके आहेत. काही ऑनलाइन वेबसाइट वर देखील उपलब्ध आहेत. काही वर्तमानपत्र किंवा लेखांच्या वेब...
23/09/2017

मराठी भाषेत असंख्य छापील नियतकालीके आहेत. काही ऑनलाइन वेबसाइट वर देखील उपलब्ध आहेत. काही वर्तमानपत्र किंवा लेखांच्या वेबसाइटची मोबाइल ऍप देखील आहेत ज्यातून वेबसाइटच आहे तशी दिसते. मराठी वाचकांना प्रतीक्षा होती स्वतंत्र अशा मोबाइल ऍपची ज्यावर निवडक लेख मोबाइलवर थेट वाचता येउ शकतील. शिवाय ते इंटरॅक्टीव्ह असायला हवे. होतकरू लेखकांना त्यावर आपले लेख प्रसीद्ध करून लोकांपर्यंत पोहोचवताही आले पाहीजे. ह्यातून सुरू झाला पुनश्च चा प्रपंच...

श्री. किरण भिडे ह्यांच्या कल्पनेने www.punashcha.com ह्या संकेतस्थळाच्या माध्यमातून आणि त्याला संलग्न अशा ऍन्ड्रॉइड मोबाइल ऍपच्या माध्यमातून ही किमया साध्य केली आहे. सदरील साइटवर वार्षीक सभासदत्वाचा पर्याय उपलब्ध असून पेमेंट गेटवेच्या माध्यमातून १००% ऑनलाइन सभासदत्व घेता येते. सशुल्क सभासदांनाच निवडक लेख वाचता येतात. नि:शुल्क सभासदांसाठी देखील अवांतर व संपादकीय विभागात लेख उपलब्ध असून त्यावर प्रतिक्रीया द्यायची सोय उपलब्ध आहे. लेख प्रसारित केल्यावर तुम्हाला मेलवर आणि मोबाईल वर त्याचं नोटिफिकेशन येईल. मग तुम्हाला वेबपोर्टल वर जाऊन किवा ऍप उघडून तो लेख वाचता येईल, आवडला तर वॉट्सऍप आणि फेसबुकवर तो शेअर करता येईल...

Holistic Community Website with Directory, "Talent Search", Matrimony & Common Wall is in making. Expected to launch pub...
13/09/2017

Holistic Community Website with Directory, "Talent Search", Matrimony & Common Wall is in making. Expected to launch publicly in on "दसरा - सिमोल्लंघन"!

Stay Tuned : http://www.kdagb.in

1st dynamic, responsive, "donation ready" NGO website is about to get launched. This is it's final shape. You can check ...
09/09/2017

1st dynamic, responsive, "donation ready" NGO website is about to get launched. This is it's final shape. You can check things in action at www.saathtrust.org. It will be inaugurated on auspicious occasion of Navratri! Clock is ticking...

If you have any suggestions then please let me know to make the best experience for NGO & Donors...

Check : http://www.saathtrust.org/

Address

36B, Regency Estates
Dombivli
421203

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ananya MultiTech Private Limited posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ananya MultiTech Private Limited:

Share