21/05/2024
ऑनेस्ट : द ऑईल स्टोरी
राधा आज खूप खूष होती! बरेच वर्षांनी मोठ्ठी सुट्टी सँक्शन झाली होती. ‘आजोळी जाऊन तर कितीतरी वर्षे झाली. आता फारसे आठवतही नाही. लास्ट इअरला असताना शेवटची गेले होते', राधाच्या मनात अनेक वर्षांचा इतिहास घोळत होता. कधी त्या आठवणींच्या गल्लीबोळात हरवत १४ वर्षे मागे गेली कळलेच नाही...
"मामाची शेती म्हणजे पारंपारीकता आणि आधुनिकतेचा अनोखा संगमच. 'घरी खातो ते आपणच पिकवायचे' हा पणजोबांचा दंडक मामा आजही कसोशीने पाळत असे. अजूनही सर्व भावंडांना घरचे तांदूळ, हरभरे, चवळी तो आवर्जून पाठवतो. पण केवळ पारंपारीक समजूती कवटाळून न बसता आवश्यक तिकडे ट्रॅक्टर, ड्रिप सारखे आधुनिक तंत्रानाची कास धरत त्याने उत्तम समतोल साधला आहे.” ...
.. "शिरीष देखील मामाच्या पठडीत छान तयार झालेला आहे. मामाच्या पिढ्यानुपिढ्यांच्या अनुभवाला त्याने आपल्या बिएससी एग्रीच्या शिक्षणाची जोड देत अनेक बदल कालानुरूप केले आहेत. त्याच्या इमेल्स आणि व्हिडीओकॉल्समधून सारे अपडेट्स मिळत असतात!”...
"अगं आई तुझा बॅगा भरून झाल्या का? उशीर होतोय".. रमाची हाक आली आणि राधा भानावर आली. रमा देखील खूप एक्सायटेड होती 'मामाच्या गावाला' जायचे म्हणून. रमाच्या वडीलांना गावच नाही. त्यांचे वडीलच शहरात स्थलांतरीत झाल्याने रमाच्या वडीलांचे सारे लहानपण गेले शहरात. इंजिनिअरींग नोकरी सारे शहरात. लग्नानंतर पिकनीक्स आणि प्रवास खूप झाले. पण रमाला गाव म्हणजे काय ते फारसे कधी अनुभवायलाच मिळाले नाही. वडीलांचे आयटी इंजीनिअरचे करीअर आणि आई आंतरराष्ट्रीय रिफाईंड तेलाच्या कंपनीत सिनीअर फूड टेक्नॉलॉजिस्ट ह्या भोवतीचे रमाचे लहानपण घुटमळत राहीले होते. खरेतर केवळ ३५० मैलावर असलेले आजोळ, पण हे अंतर ओलांडायला तिच्या वयाची १४ वर्षे लागली होती..
गावोगावच्या सीमा ओलांडताना हळूहळू बदलत जाणारी भाषा, संस्कृती ती अनुभवत होती. महाराष्ट्रात आल्यावर तर तिला मराठी शब्द कानावर पडल्यावर मजाच वाटली. घरी आई-बाबांची ही सिक्रेट भाषा असल्यासारखी होती. बरेचवेळा तिला ते काय बोलतात हे कळतच नसे. इंग्रजी शाळा, दाक्षीणात्य सहकारी ह्यामुळे मराठी, मातृभाषा असुनही तिला परकीच होती. आता तर रेडीओवर देखील FM मराठीत होते! ज्वारीची भाकरी तिने पहिल्यांदाच खाल्ली. ज्वारीची भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी हे कॉम्बिनेशनच तिला खूप आवडले. यथावकाश ते मामाच्या गावी पोचले. ८ तासांचा प्रवास पण त्या उत्साहात अगदी छान पार पडला..
घरी गेल्याबरोबर पहिल्यांदाच आलेल्या भाचीचा काय पाहूणचार विचारू नका. मामी आणि आजीचा उत्साह - आनंद तर गगनात मावत नव्हता. शेतातला ताजा हुर्डा काय, पोपटी काय, बागेतली फ्रेश फळे काय. धमाल चालू होती. सकाळी गायींना चरायला सोडायचे, भरपूर नाष्ता करायचा, मोकळ्या माळावर फिरायला जायचे, सायकल चालवायची, तळ्यावर आंघोळ करायची आणि उन वर आले की जेवायला घरी यायचे असा मस्त कार्यक्रम होता. गावाकडची संध्याकाळ तर खूपच छान. थंडी पडायची. शेकोट्या पेटायच्या. शेकोटीवर कणसे भाजून खायची. मग गप्पांचा फड लागायचा...
“अरे तेल संपायला आलेय, शेठच्या घाण्यावरून घेऊन ये”, मामी म्हणाली
“कुठले तेल वापरता तुम्ही? माझा कंपनीने हल्लीच राईस ब्रान तेल आणलेय. एकदम हलके, दर्जेदार आणि आरोग्यवर्धक” .. “हृदयासाठी तर एक नंबर!”, राधा सांगत होती..
“कायपण काय ताई? अगं तांदळाच्या ब्रानमधे तेल ते किती? ८-१०%. किती तांदूळ पिकतो देशात? देशभरातील सारा ब्रान एकत्र करून जितके तेल निघणार नाही त्याच्या हजारो पटीने राईसब्रान तेल हे बाजारात विकत आहेत", इती शिरीष ...
.. आणि राधा एकदम भानावर आली. स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या 'तेलाच्या खरेदीचे ऑर्डरबुक्सच' तिच्या डोळ्यासमोरून झर्रकन गेले. त्यात पाम तेल, मिनरल तेल, एक्सपायर झालेले तेल, प्राण्यांची चरबी असे सर्व काही असायचे. मग हे सारे तेल ३००-४०० डिग्री पर्यंत तापवले जायचे जेणे करून ते एकमेकांत चांगले मिसळले जाई. मग त्यावर हेक्झेन सारख्या केमिकलच्या प्रक्रीया, त्याचे वास-रंग काढून टाकायला ब्लिचींग असे अनेक प्रकार केले जात. मग "रिफाईंड तेल" नावाचा एक तरल पदार्थ तयार होत असे. मग त्यामधे हवा तो एसेंस मिसळला की झाले हवे ते तेल. राईस ब्रान हवे तर तो एसेंस, शेंगदाणा हवे तर तो एसेंस. मूळ केमीकल तेच! आणि मग हे कसे हलके, आरोग्यदायी हे पटवून द्यायला सेलीब्रिटींना घेऊन जाहिरातींचा भडीमार...
राधा तर ह्या सर्व प्रकरणांचा भागच होती. ॲड आणि सेल्स डिपार्टमेंट सोडले तर बहुतेक सर्वच विभाग आणि प्रक्रीयांशी तिचा संबंध होता. पण राधा केवळ करीअरसाठी भुकेलेली प्रोफेशनल नव्हती. अत्यंत स्टुडीअस अशा राधाने प्रचंड अभ्यास करून तिचे करीअर साकारले होते. मोठ्या मेहनतीने ही पोस्ट मिळवली होती आणि प्रचंड स्पर्धेला तोंड देत ती टिकवली होती. “शिऱ्या तुझे म्हणणे जरी खरे असले तरी प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानामागे एक खोल विचार असतो, संशोधन असते. चला काहीतरी खराब वस्तू विकून लोकांना फसवूया अशा प्रकारे कुणी प्रॉडक्ट बनवत नाही की संशोधन करत नाही"
“पूर्वी गावोगावी तेलाचे घाणे होते. लोक आपापल्या शेतात पिकणाऱ्या तेलबिया घेऊन जात व फ्रेश तेल गाळून आणत. अधिकचे तेल इतरांना विकले जात होते. पण जसे शहरीकरण वाढीस लागले तसे मोठ्या प्रमाणात गाव खेड्यातून लोक शहरात स्थलांतरीत झाले. छोट्या छोट्या शहरात मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढली. तिथे वसणाऱ्या माणासांची व्यस्तता गावातील लोकांपेक्षा खूप जास्त होती. त्यामुळे "पॅकेज" केलेल्या जीवनावश्यक वस्तूंचा वापर वाढला. तेलातील आर्द्रतेसारख्या घटकांमुळे तेल पटापट खराब होत असे. त्यामुळे तेलावर प्रक्रीया आवश्यक होती. शिवाय विवीध प्रकारची तेले वेगवेगळी उपलब्ध करणे हे देखील एक आव्हान होते. ह्याहून पुढील आव्हान होते त्याच्या किमती. ह्यासाठी तेलावरील विवीध प्रक्रीया करून त्याचे 'रिफाईंड' हे नविन स्वरूप साकारले गेले. हे तेल दीर्घकाळ खराब होत नसे, वारंवार तळणासाठी वापरले तरी काळे पडत नसे.” ...
“मोठ्या प्रमाणावर जेव्हा आपण एखादी गोष्ट बाजारात आणतो तेव्हा ती जबाबदारी देखील असते. घाण्याच्या तेलाच्या कच्च्या मालाची क्वालिटी बदलली की लगेच त्याचा रंग आणि चव बदलत असे. पण रिफाईंड तेल कितीही मोठ्या प्रमाणात, कुठल्याही बॅचचे घेतले तरी त्याचा रंग, चव व गुणधर्म कधीच बदलत नाही. वर्षानूवर्षे हा एकसमान दर्जा सातत्याने टिकवणे हे खरेच एक मोठे आव्हान आहे जे रिफाईंड तेला इंडस्ट्रीने लिलया पेलले!” ...
“अगं हे जरी खरे असले तरी मुळात जे तेल म्हणून आपण जे वापरतो ते तेलच नसेल तर काय? एकसमानता म्हणजे uniformity ला जितके महत्व आहे तितकेच महत्व 'कच्च्या मालाच्या खात्रीला' म्हणजे conformity ला आहे ना. जे तेल मी शेंगदाणा तेल म्हणून खातोय ते नसेलच शेंगदाणा तेल तर? त्यात ६०% पर्यंत दुसरेच काहीतरी मिक्स केलेले असेल तर? आणि सगळ्यात वाईट म्हणजे ती भेसळ प्रामाणीकपणे कबूलही केलेली नाही. मला शुद्ध शेंगदाणा तेल म्हणून भेसळ केलेले केमिकल विकत असतील तर ही फसवणूक नाही का?”, शिरीषने एकाच मुद्यात राधाला निरूत्तर केले होते. “ह्या अनेक तेलांच्या भेसळीला 'एकसमानता' मिळवून देण्यासाठी त्याला मोठ्या प्रमाणात तापवतात, त्यात जे केमिकल घालतात आणि ज्या प्रकारे त्याचे मूळ गुणधर्म बदलतात त्याच्या शरीरावर होणाऱ्या दुष्परीणामांचे काय? साध्या सांधेदुखी पासून सुरूवात होऊन हळूहळू बिपी, शुगर, हार्ट, कॅन्सर सारख्या अनेक आजारांना ह्यामुळेच सबळ कारण मिळते हे तथ्य नाकारता येत नाही ना?”
"रिफाइंड तेलाच्या माध्यामातून आपण रोज स्लो पॉयझनला बळी पडतो आहोत”... राधाचा चेहरा पडला होता. तिच्याकडे डिफेंसला शब्दच नव्हते. खरेच तर बोलत होता शिऱ्या. आणि शहरीकरणाच्या अपरीहार्यतेमुळे आपण हे वर्षानुवर्षे सहन करतोय हे देखील तिला जाणवत होते...
“चल मला पण बरीच वर्षे झाली घाण्याचे तेल पाहून. मी पण येते तुझा सोबत", राधा म्हणाली.
“मी पण, मी पण", रमाने देखील उडी मारली..
तिघेही घाण्यावर जायला निघाले. वाटेत शिरीष राधाला लाकडी घाण्याचे तेल आणि त्याचे आरोग्यवर्धक फायदे सांगत होता. पूर्वी त्यांच्या गावात लोखंडी घाणे होते. पण बरेच वर्षे रिफाईंड तेलामुळे पारंपारीक तेलघाणे भंगारमधे विकले गेले. गेल्याच वर्षी गावात नविन लाकडी घाणा आला होता. आणि तेलाची क्वालिटी खूपच छान होती. लोखंडी घाण्याच्या कोल्डप्रेस ऑईलपेक्षा हे तेल थोडे महाग होते पण त्याचा अरोमा खूप छान होता. लाकडी घाण्यामुळे तेल गाळले जाताना करपत नसे. त्यातील सात्विक गुणधर्म तसेच रहायचे...
दुकानात पोचताच रमाची पहिली प्रतिक्रीया, “शी, हे किती गढूळ दिसते. त्यापेक्षा आईच्या कंपनीचे तेल किती छान पारदर्शक, सोनेरी असते" ...
“अगं ते १००% नैसर्गिक आहे ना. ते गढूळ असणे हीच त्याच्या शुद्धतेची परीक्षा आहे!”, दुकानदार काका हसत म्हणाले. राधा काही म्हणाली नाही पण दुकानातील अस्वच्छपणा, कामगारांचा गलीच्छपणा, घाण्याची अवस्था आणि तेलातील गाळ तिच्या देखील मनात काहूर माजवत होते. परत येत असताना ती शिरीषला म्हणाली, “शिऱ्या, घाण्याच्या तेलाचे '१००% नैसर्गिक' हे जरी खरे असले तरी त्यातील गढूळपणा आणि अस्वच्छता आपण कसे दुर्लक्षीत करू शकतो?”. त्यावर शिरीष म्हणाला, “अगं नैसर्गिक जे काही असते ते नेहमीच आरोग्यासाठी उत्तम असते. त्यावर प्रक्रीया करून तुम्ही ते शुद्ध, पारदर्शक वगैरे करायला जाता तेव्हाच खरा गोंधळ चालू होतो"..
“अरे मामा, नैसर्गिक म्हणून आपण केळे सालासकट खातो का? डाळींबातील बिया खातो का? नैसर्गिक ते सारेच खाण्यायोग्य असे कधीच नसते.”, रमाने मधे नाक खुपसलेच. “मी नाही ह्या तेलातले कुठले पदार्थ खाणार मामा. चिखलात तळल्यासारखे वाटेल ... इईइईइई".. तिच्या डोक्यातून काही केल्या तो गढूळपणा जात नव्हता!
“शिऱ्या, आजोबा सांगायचे ना, तसे आपल्याला सुवर्णमध्य गाठता यायला हवा. रिफाईंड वाइट ह्या बद्दल आता मनात शंका नाही. पण केवळ '१००% नैसर्गिक' म्हणून कुणी आपल्या गळ्यात गढूळ, घाणेरडे काही मारत असेल तर कसे चालेल? तिथे जे लोक काम करत आहेत त्यांच्या आरोग्याचे, स्वच्छतेचे काय? एक मावशी तिकडे तेल भरताना खोकत होती आणि परत त्याच हाताने तेल भरत होती. ते देखील नरसाळ्यातून. हल्लीच आपण कोरोना सारख्या भयावह प्रकरणातून कुठे सावरतोय. अशा अस्वच्छतेमुळे, गलीच्छपणामुळे जो संसर्ग होऊ शकतो ह्याची कल्पना तरी केली आहे का? आणि हे सारे आपण महाग तेल विकत घेऊन करतोय. जणू दुखणे विकत घेतोय की काय!”, इती राधा.
शिरीष म्हणाला, “अगं सुरूवातीला त्याने कापडाच्या फिल्टरमधे ते फिल्टर करायचा प्रयत्न केलेला. पण तो गाळ जो आहे तो तेलातच आहे. तो नाही सहजपणे निघत. आणि तो कपडा पण इतका चिकट होतो की सहजपणे धुतला जात नाही. मग त्याने तसेच विकायला सुरूवात केली.” ... “पण तिथे असलेल्या कामगारांच्या आरोग्याचा, अस्वच्छपणाचा आणि संसर्गाचा मुद्दा मात्र योग्यच आहे. पण करणार तरी काय ना? घरी आणून जरी आपण फिल्टर केले तरी सगळा गाळ जाणार नाही आणि जंतूसंसर्ग तर राहणारच!”
राधा म्हणाली, “करणार काय हा वेगळा विषय! एकदा आपण काय चूक करतोय हे कळले आणि काय साध्य करायचे आहे हे लक्षात आले की ते करायचे कसे हे तितकेही कठीण नसते. सोशल मीडियाचा जसा जवळच्या लोकांच्या संपर्कात रहाण्यासाठी फायदा होतो तसाच अनेक प्रयोगशील, उद्यमशील लोकांशी ओळख देखील होते. काही महिन्यापूर्वी माझी एका अशाच समूहाशी ओळख झाली जे 'कोरा' नावाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रीय आहेत. कोरावरील काही धडपड्या मराठी लोकांनी मिळून 'आषाढी व्हेंचर्स' नावाची एक संस्था चालू केली आहे. तिथे ते अशा वेगळ्या विषयांवर काम करतात. आपण त्यांच्यासमोर हा विषय मांडूया. बघू काय होते"...
मग तो विषय आला 'आषाढी व्हेंचर्स' च्या प्लॅटफॉर्मवर. बघता बघता ३० जण एकत्र आले आणि लाकडी घाण्याचे परंतू 'विश्वासार्ह' तेल कसे बनवायचे ह्या विषयावर काम चालू झाले. कुठलेही केमीकल वापरायचे नाही, तापमान द्यायचे नाही हे तर आषाढीअन्सच्या डिएनएमधेच आहे जणू. त्यामुळे तेलाच्या शुद्धीकरणावर काम चालू झाले. कपड्याचे किंवा स्क्रीनचे फिल्टर फारसे परीणामकारक नव्हते. आणि गाळाचे तेलाशी बॉण्डिंग खूप घट्ट होते. त्यामुळे ते सहज फिल्टर होत नसे. त्यातील एकाचा आयुर्वेदातील अनुभव कामी आला. आयुर्वेदात काही काढ्यांचे शुद्धीकरण करून एकदम तरल काढा मिळवायचा असेल तर सेंट्रीफ्यूज पंप वापरतात. मग अशा प्रकारचा एक विशेष सेंट्रीफ्यूज पंप डिझाईन करून त्यावर प्रयोग केले. तेव्हा साधारण ५-६% गाळ वेगळा झाला. मग ही प्रक्रीया अजून परफेक्ट करण्याकडे बराच वेळ गेला. त्या दरम्यान तेल निर्जंतूक व्हावे ह्यासाथी नैसर्गिक रित्या काय करता येईल ह्यावर देखील काम चालू होते. त्यावर पर्याय निघाला समुद्री मिठाचा. अशा प्रकारे तेलातील अनावश्यक गाळ काढून, जंतू संसर्ग काढून नैसर्गिक पण दर्जेदार तेल तयार झाले. ह्यावर चांदीचे फिल्टर वापरून ॲक्टीवेशन केले गेले. चांदीच्या संपर्कात आलेली गोष्टीला रजोगुण प्राप्त होतो जो शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. अशा प्रकारे तयार झाले नैसर्गिक, कुठलेही केमीकल न वापरता शुद्ध आणि निर्जंतूक केलेले आणि चांदीने प्रभावीत केलेले दर्जेदार तेल!
मग प्रश्न होता, ह्याला नाव काय द्यायचे? तर ज्या मुद्यावर ह्या प्रोजेक्टची रचना झाली तो म्हणजे 'विश्वासार्हता' आणि 'खरेपणा'. म्हणून नाव ठेवले 'ऑनेस्ट' आणि ही आहे ऑनेस्ट ऑईल स्टोरी!
रामनवमीच्या शुभमुहूर्तावर ऑनेस्ट ऑईल मार्केटमधे सादर झाले. चांगला रिस्पॉन्स आहे. तुम्ही देखील नक्की वापरून पहा. आणि तुमचा अनुभवदेखील आमच्या बरोबर शेअर करा. आम्ही नवीन राधा, शिरीष, रमा शोधतच आहोत. जे आम्हाला असे व्यापक प्रोजेक्ट करायच्या संधी देतील!
आम्ही आहोत आषाढी! सोशल मीडियावरील अनोळखी पण उद्यमशील लोकांनी चालू केलेली लिडरलेस वारी! आणि ही वारी सर्वांसाठी खुली आहे. अविरत आहे..
https://aashadhi.com/
https://aashadhi.com/product/honest-groundnut-oil/
आमचा व्हाट्सॕॅप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/LcGy8TIvPsn7cL2P5k77si