17/12/2025
*"ग्रंथराज" श्री संत संताजी महाराज!*
******०*******०*******०*******०******
भारत-भू ला संपूर्ण जगामध्ये अध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे स्थान आहे! या भारत भूमीवर "जप-तप" साधना करून अनेक साधुसंतांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे! आजही सह्याद्री पर्वतरांगांमध्ये साधुसंतांचे अस्तित्व बघायला मिळते! आणि ह्या अशा साधुसंतां मुळेच भारताची भूमी ही पावन झालेली आहे. त्यातही महाराष्ट्राचे एक आगळे असे स्थान बघायला मिळते आणि म्हणूनच अत्यंत ताठमाने ने येथील लोक महाराष्ट्राचे गोडवे गातात! *जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीतामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची छबी दिसून येते!* तद्वतच, अनेक विठ्ठल भक्त या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले जसे की संत नामदेव महाराज, संत गोरोबा काका, संत रविदास महाराज, संत सावता काका, संत गुरु गोरखनाथ, संत चोखामेळा संत ज्ञानेश्वर महाराज, संत दामाजीपंत, संत रविदास महाराज अशा अनेक संतांनी या भारत भूमीवर अध्यात्माचा ठसा उमटविला आहे या संत मालिकेमध्ये ४०० वर्षांपूर्वी म्हणजे इसवी स.न. १६०० मध्ये संत तुकाराम महाराज आणि संत संताजी महाराज यांचा प्रमुख्याने उल्लेख करता येईल म्हणूनच महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते! दिनांक ८ डिसेंबर १६२४ हा "सुवर्ण-दिन" या सुवर्ण-दिनी "तेली-कुळा" मध्ये आणखी एक संत जन्मास आले तेच हे "तैल-कुलभूषण" श्री संत संताजी महाराज होत. श्री संत संताजी महाराजांचा जन्म एका सधन कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय हा तेल काढण्याचा होता, त्यांच्या पित्याचे नाव विठोबापंत तर आईचे नाव मथाबाई होते, मथाई सोनवणे च्या पोटी "पुत्र-रत्न" जन्माला आले! तेच हे संत संताजी महाराज होय. वर उल्लेख केल्याप्रमाणे संताजी महाराजांचा जन्म इसवी स.न. १६२४ मध्ये ८ डिसेंबर या दिवशी पुणे जिल्ह्यातील तालुका मावळ सुदुंबरे येथे त्यांच्या मामाच्या गावी झाला असून, एकदा चाकण येथील श्री चक्रेश्वर मंदिरात संताजी महाराजांचे वडील विठोबापंत यांनी बांधून लोकार्पण केलेल्या चक्रेश्वराच्या मंदिरात जगद्गुरू तुकोबारायांचे किर्तन होते, हे कीर्तन ऐकण्यासाठी गावातील लोक या मंदिरांमध्ये जमले होते, त्याच प्रमाणे जगद्गुरू तुकोबाराय यांचे कीर्तन ऐकण्यासाठी, संताजी महाराजांचे माता-पिता देखील या किर्तन ऐकण्यासाठी बाल "संतु" ला घेऊन आले होते. ठरल्या वेळी जगद्गुरू तुकोबाराय यांची कीर्तनाला सुरुवात झाली, अत्यंत मधुर वाणीने जगद्गुरु तुकोबाराय किर्तन करीत होते जगद्गुरु तुकोबारायांच्या या अधिकार वाणीचा प्रभाव आपल्या संताजी महाराजांवर पडला आणि ह्या कीर्तन प्रसंगीच श्री संत संताजी महाराजांची अक्षरश: समाधी लागली! हे पाहून सर्व उपस्थित जनसमुदाय आश्चर्यचकित झाला, बघता-बघता ही गोष्ट तुकोबारायां पर्यंत पोहोचली तुकोबारायांचे दोन तासापर्यंत चाललेले कीर्तन संपले. परंतु संताजी महाराजांची समाधी काही सुटली नाही. तुकाराम महाराज त्यांच्याजवळ आले आणि पाहतात तर काय संताजी महाराज कीर्तनात रमून गेले! *विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असे नामस्मरण सुरु होते* हे नामस्मरण मध्येच थांबवून तुकोबारायांनी स्वतः संताजीला जागे केले आणि आपल्या उराशी घट्ट धरले, यावेळी नामस्मरणात बेभान झालेले संताजी भाना वर आले आणि बघतात तर काय प्रत्यक्ष तुकोबारायांनी त्यांना जवळ घेतल्याचे पाहून त्यांना अधिकच हर्ष झाला! आणि यावेळेस त्यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आल्याशिवाय राहिले नाही बाल संताजींनी यावेळी तुकोबारायांना साष्टांग नमस्कार केला व मी देखील आज पासून तुमच्या सोबत येतो असे म्हटल्याबरोबर तुकोबारायांनी 'बाल-संतु' ची समजूत घातली व पाठी वरून मायेने हात फिरवित सांगितले बाळ संतु, संसार करून परमार्थ साधायचा असतो हे तुकोबारायांचे वाक्य गुरु-प्रसाद समजून संताजी महाराजांनी तुकोबारायांना साष्टांग अभिवादन केले. आणि आपल्या माता-पित्यां समवेत घरी परतले इथून पुढे संताजी महाराज भगवद भक्त झाले खऱ्या अर्थाने विठ्ठल भक्त झाले उभ्या आयुष्यात एकही क्षण वाया जाऊ न देता त्यांनी अभंग रचना रचायला सुरुवात केली त्यांच्या प्रसिद्ध अभंगा पैकी मला ज्ञात असलेल्या अभंगाच्या ह्या दोन ओळी *चारिता गोधने तुकोबांचे लिहिले अभंग आम्हां जाहले येणे एका तेलिया कारणे* अशी अभंग रचना लिहीत असताना संताजी महाराजांचे अध्यात्मिक ज्ञान वाढत गेले! त्यांनी स्वतः
*"तैलसिंधू" व "शंकर दीपिका* नावाचे दोन ग्रंथ लिहिले आणि मग ते तुकाराम महाराजांच्या सोबत किर्तनाला जायला लागले व ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे कीर्तन असायचे त्या ठिकाणी तुकाराम महाराज अभंगा द्वारे कीर्तन करत असताना श्री संत संताजी महाराज ते अभंग टिपून घ्यायचे म्हणजेच लिहायचे अशाप्रकारे तुकाराम महाराजांचे अभंग लिहीत लिहीत त्याची एक भली मोठी "गाथा" तयार झाली, तीच ही अभंग रूपाने आज रोजी उपलब्ध असलेली
"तुकाराम गाथा" होय. या "*तुकाराम-गाथा" चे लेखक हे श्री संत संताजी महाराज आहेत हे सांगताना छाती अभिमानाने फुलून येते*" इतक्या महत् प्रयासाने लिहून तयार केलेली अभंग रचना एका रामेश्वर भटा ने पवित्र इंद्रायणी नदी पात्रामध्ये फेकून दिली. त्यामुळे तुकाराम महाराज "मना" ने खचले होते त्यांनी जेवण सोडले होते, काहीच खाजगीत नव्हते अन्न पाण्याचा त्यात केला होता अशावेळी संताजी महाराजांनी आपल्या गुरूला वचन दिले देवा मी इतक्या सहज पणे ही गाथा नष्ट होऊ देणार नाही तुम्ही काही काळजी करू नका! *मला ज्ञात असलेल्या अभंगाची रचना मी पुन्हा लिहून काढतो आणि तुमच्या स्वाधीन करतो असे म्हटल्यावर तुकोबारायांना हर्ष झाला.* आणि संताजी महाराजांनी आठवत आठवत अभंग लिहायला सुरुवात केली *हाताचा पाळणा आणि नेत्री ची ज्योत प्रज्वलीत* करून संताजी महाराजांनी संपूर्ण अभंग गाथा लिहून काढली. आणि तुकोबारायांच्या स्वाधीन केली यावेळी तुकोबारायांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आणि तेव्हापासून संताजी महाराज तुकाराम महाराजांचे अत्यंत प्रिय असे शिष्य झाले. अशाप्रकारे संताजी महाराजांनी १ "तुकाराम-गाथा" २"तैलसिंधू" आणि ३ "शंकर दीपिका" हे तीन महाकाव्य त्यांनी लिहिले आहेत व जगाच्या स्वाधीन केले एकाच जन्मात तीन ग्रंथ लिहिणारा संत असा श्री संताजी महाराजांचा प्रामुख्याने उल्लेख केल्या जातो आणि म्हणूनच त्यांचे *सोनवणे हे आडनाव बदलून जग-नाडे म्हणजेच जग न नाडे असे करण्यात आले* संताजी महाराजांचे वंशज आज ही चाकणला वास्तव्यास आहेत. आणि हो राजा दशरथाच्या रथाचे चाक याच ठिकाणी निखळून पडले होते म्हणून या गावाला चाकण हे नाव पडले आहे. असो! संताजी महाराजांचा जन्म हा चाकणला झाला असला तरी त्यांचे अध्यात्मिक कार्य हे साऱ्या विश्वात आहे संताजी महाराजांची समाधी *श्रीक्षेत्र सदुंबरे तालुका मावळ जिल्हा पुणे येथे आहे* दरवर्षी येथे
*"श्रीं चा जन्मोत्सव" व यात्रा महोत्सव साजरा करण्यात येतो* तसेच महाराष्ट्रातील *सर्व धार्मिक स्थळे श्री संत संताजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करतात.* त्याचप्रमाणे वाशिम जिल्ह्यातील *( ऋषीवट-धाम ) रिसोड नगरीत 1997 पासून श्री संत संताजी महाराजांची भव्य मिरवणूक पालखी सोहळा हर्षोल्हासात साजरा करण्यात येतो.* 🌹🙏🙏🌹
👇 लेखक:-
*ज्ञानेशप्रसाद,*
*"श्री संताजी निवास"*
संवाद :- 9923230821
🙏🙏