Friends of Ujwal Gulhane

Friends of Ujwal Gulhane Technocrat, Agriculturist, Social Entrepreneur Principal General Manager BSNL India

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम!              -------------------------------------                        ...
14/04/2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम! ------------------------------------- बोधिसत्व!
परमपुज्य!
महामानव!
महापूरुष!
युगपुरुष!
भारतरत्न!
ज्ञानरत्न!
विश्ववंदनीय! विश्वरत्न!
विश्वभुषण!
विश्वविभूती!
प्रज्ञासूर्य!
ज्ञानसुर्य!
क्रांतीसर्य!
क्रांतिकारी!
युगप्रवर्तक!
महविद्वान!
समाजसुधारक!
थोर विचारवंत!
थोर अभ्यासक!
थोर शास्त्रज्ञ!
कायदेपंडित!
वकिल!
संपादक!
लेखक!
प्राध्यापक!
पत्रकार!
बॅरिस्टर- डी .लिट!
महानायक!
ग्रंथप्रेमी!
अर्थतज्ञ!
अर्थज्ञानी!
समतावादी!
प्रखर राष्ट्रप्रेमी!
सत्याग्रही!
प्रभावीवक्ता!
विद्याव्यासंगी!
समाजधर्मयोगी!
घटनातज्ञ!
तर्कशास्त्रज्ञ!
समाजशास्त्रज्ञ!
मानववंशशास्त्रज्ञ!
इतिहासशास्त्रज्ञ!
शिक्षणतज्ञ!
शेतीतज्ञ!
तर्कशास्त्रकार!
इतिहासकार!
दुरदृष्टी विचारवंत!
कलमाचा महाराजा!
शिक्षणाचा महमेरु!
कामगार नेता!
महान विद्यार्थी!
महान शिक्षक!
मार्गदाता!
मुक्तीदाता!
ज्ञानाचे प्रतिक!
द ग्रेट क्रिएटर!
द ग्रेट इंडियन!
ज्ञानाचा अथांग सागर
भारतीय राज्य घटनेने शिल्पकार ✨
यांच्या 135 व्या जयंती उत्सव निमित्त,
सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....!!
व मानाचा जय भिम.....!!
✨💙🌸💐🙏🏻🙏🏻🙏🏻🌸‼️ 👏👏‼️✒️‼️

माननीय केंद्रीय संचार और पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्री श्री ज्योतिरादित्य सिंधिया जी की गरिमामयी उपस्थिति में मध्य प्र...
15/03/2026

माननीय केंद्रीय संचार और पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्री श्री ज्योतिरादित्य सिंधिया जी की गरिमामयी उपस्थिति में मध्य प्रदेश के गुना जिले के उमरी गांव में ‘समृद्धि केंद्र’ का उद्घाटन किया गया।

दूरसंचार विभाग की ‘समृद्ध ग्राम फिजिटल सेवा' की प्रायोगिक पहल के अंतर्गत स्थापित यह एकीकृत फिजिटल (भौतिक + डिजिटल) सेवा केंद्र ग्रामीण नागरिकों को एक ही स्थान पर विभिन्न डिजिटल और नागरिक सेवाएं उपलब्ध कराएगा।

यह पहल ग्रामीण क्षेत्रों में डिजिटल कनेक्टिविटी को सशक्त बनाते हुए सेवाओं की आसान और प्रभावी पहुंच सुनिश्चित करने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम है।



चीर के ज़मीन को, मैं उम्मीद बोता हूँ,मैं किसान हूँ, चैन से कहाँ सोता हूँ।राष्ट्रीय किसान दिवस की हार्दिक शुभकामनाएं एवं ...
23/12/2025

चीर के ज़मीन को, मैं उम्मीद बोता हूँ,
मैं किसान हूँ, चैन से कहाँ सोता हूँ।

राष्ट्रीय किसान दिवस की हार्दिक शुभकामनाएं एवं बधाई!✨🌾🌿🌻🎉👏

पुण्यतिथी निमित्य 👏विनम्र अभिवादन👏संत गाडगे महाराज : कर्मयोगाचा चालता-बोलता आदर्शसमाज सुधारणा ही भाषणांनी नव्हे, तर कृती...
20/12/2025

पुण्यतिथी निमित्य 👏विनम्र अभिवादन👏
संत गाडगे महाराज : कर्मयोगाचा चालता-बोलता आदर्श

समाज सुधारणा ही भाषणांनी नव्हे, तर कृतीने घडते, हे संत गाडगे महाराजांनी आपल्या आयुष्याने सिद्ध करून दाखवले. २० डिसेंबर १९५६ रोजी या महान कर्मयोग्याचे निर्वाण झाले, मात्र त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रकाश आजही समाजाला दिशा देत आहे. गाडगे महाराजांची पुण्यतिथी ही केवळ स्मरणाची नव्हे, तर आत्मपरीक्षणाची वेळ आहे.
गाडगे महाराजांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. गरिबी, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचा त्यांनी अगदी जवळून अनुभव घेतला. मात्र परिस्थितीला दोष न देता त्यांनी समाजपरिवर्तनाचा मार्ग स्वीकारला. हातात झाडू, डोक्यावर फाटकी टोपी आणि मुखात निर्भीड सत्य—हीच त्यांची ओळख बनली.
त्यांचा संतपणा देवळात किंवा गाभाऱ्यात अडकलेला नव्हता. “देव शोधायचा असेल तर माणसात शोधा” हा त्यांचा स्पष्ट संदेश होता. स्वच्छता, शिक्षण, व्यसनमुक्ती आणि सामाजिक समता यांसाठी त्यांनी आयुष्य वेचले. गावोगावी फिरून कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी अंधश्रद्धा, जातिभेद, दारूचे व्यसन यावर प्रहार केला. त्यांच्या कीर्तनात भक्तीपेक्षा सामाजिक प्रबोधन अधिक होते.
गाडगे महाराजांनी उभारलेली धर्मशाळा, अनाथालये, शिक्षणसंस्था ही त्यांच्या कार्याची साक्ष देतात. त्यांनी कधीच स्वतःसाठी काही मागितले नाही, पण समाजासाठी सर्वस्व अर्पण केले. लोकांकडून मिळालेला पैसा त्यांनी समाजाच्या गरजांसाठी वापरला. खरा संत तोच, जो समाजाच्या दुःखावर फुंकर घालतो—हे त्यांनी कृतीतून दाखवले.
आजच्या काळात, जिथे अस्वच्छता, व्यसनाधीनता, दिखाऊ धार्मिकता आणि सामाजिक विषमता वाढताना दिसते, तिथे गाडगे महाराजांचे विचार अधिकच समर्पक ठरतात. त्यांच्या पुण्यतिथीला फक्त माल्यार्पण करून थांबणे पुरेसे नाही; त्यांच्या विचारांचे आचरण हाच त्यांना खरा आदर आहे.
स्वच्छता ही सेवा आहे, माणूसकी हाच धर्म आहे आणि कृती हाच खरा उपदेश आहे *हा गाडगे महाराजांचा संदेश प्रत्येक पिढीने आत्मसात करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल👏

By जनसेवक
बाबुभाऊ देशमुख(कुरूम)

*"ग्रंथराज" श्री संत संताजी महाराज!*******०*******०*******०*******०******भारत-भू ला संपूर्ण जगामध्ये अध्यात्मिक दृष्ट्या...
17/12/2025

*"ग्रंथराज" श्री संत संताजी महाराज!*
******०*******०*******०*******०******
भारत-भू ला संपूर्ण जगामध्ये अध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे स्थान आहे! या भारत भूमीवर "जप-तप" साधना करून अनेक साधुसंतांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे! आजही सह्याद्री पर्वतरांगांमध्ये साधुसंतांचे अस्तित्व बघायला मिळते! आणि ह्या अशा साधुसंतां मुळेच भारताची भूमी ही पावन झालेली आहे. त्यातही महाराष्ट्राचे एक आगळे असे स्थान बघायला मिळते आणि म्हणूनच अत्यंत ताठमाने ने येथील लोक महाराष्ट्राचे गोडवे गातात! *जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीतामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची छबी दिसून येते!* तद्वतच, अनेक विठ्ठल भक्त या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले जसे की संत नामदेव महाराज, संत गोरोबा काका, संत रविदास महाराज, संत सावता काका, संत गुरु गोरखनाथ, संत चोखामेळा संत ज्ञानेश्वर महाराज, संत दामाजीपंत, संत रविदास महाराज अशा अनेक संतांनी या भारत भूमीवर अध्यात्माचा ठसा उमटविला आहे या संत मालिकेमध्ये ४०० वर्षांपूर्वी म्हणजे इसवी स.न. १६०० मध्ये संत तुकाराम महाराज आणि संत संताजी महाराज यांचा प्रमुख्याने उल्लेख करता येईल म्हणूनच महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते! दिनांक ८ डिसेंबर १६२४ हा "सुवर्ण-दिन" या सुवर्ण-दिनी "तेली-कुळा" मध्ये आणखी एक संत जन्मास आले तेच हे "तैल-कुलभूषण" श्री संत संताजी महाराज होत. श्री संत संताजी महाराजांचा जन्म एका सधन कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय हा तेल काढण्याचा होता, त्यांच्या पित्याचे नाव विठोबापंत तर आईचे नाव मथाबाई होते, मथाई सोनवणे च्या पोटी "पुत्र-रत्न" जन्माला आले! तेच हे संत संताजी महाराज होय. वर उल्लेख केल्याप्रमाणे संताजी महाराजांचा जन्म इसवी स.न. १६२४ मध्ये ८ डिसेंबर या दिवशी पुणे जिल्ह्यातील तालुका मावळ सुदुंबरे येथे त्यांच्या मामाच्या गावी झाला असून, एकदा चाकण येथील श्री चक्रेश्वर मंदिरात संताजी महाराजांचे वडील विठोबापंत यांनी बांधून लोकार्पण केलेल्या चक्रेश्वराच्या मंदिरात जगद्गुरू तुकोबारायांचे किर्तन होते, हे कीर्तन ऐकण्यासाठी गावातील लोक या मंदिरांमध्ये जमले होते, त्याच प्रमाणे जगद्गुरू तुकोबाराय यांचे कीर्तन ऐकण्यासाठी, संताजी महाराजांचे माता-पिता देखील या किर्तन ऐकण्यासाठी बाल "संतु" ला घेऊन आले होते. ठरल्या वेळी जगद्गुरू तुकोबाराय यांची कीर्तनाला सुरुवात झाली, अत्यंत मधुर वाणीने जगद्गुरु तुकोबाराय किर्तन करीत होते जगद्गुरु तुकोबारायांच्या या अधिकार वाणीचा प्रभाव आपल्या संताजी महाराजांवर पडला आणि ह्या कीर्तन प्रसंगीच श्री संत संताजी महाराजांची अक्षरश: समाधी लागली! हे पाहून सर्व उपस्थित जनसमुदाय आश्चर्यचकित झाला, बघता-बघता ही गोष्ट तुकोबारायां पर्यंत पोहोचली तुकोबारायांचे दोन तासापर्यंत चाललेले कीर्तन संपले. परंतु संताजी महाराजांची समाधी काही सुटली नाही. तुकाराम महाराज त्यांच्याजवळ आले आणि पाहतात तर काय संताजी महाराज कीर्तनात रमून गेले! *विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असे नामस्मरण सुरु होते* हे नामस्मरण मध्येच थांबवून तुकोबारायांनी स्वतः संताजीला जागे केले आणि आपल्या उराशी घट्ट धरले, यावेळी नामस्मरणात बेभान झालेले संताजी भाना वर आले आणि बघतात तर काय प्रत्यक्ष तुकोबारायांनी त्यांना जवळ घेतल्याचे पाहून त्यांना अधिकच हर्ष झाला! आणि यावेळेस त्यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आल्याशिवाय राहिले नाही बाल संताजींनी यावेळी तुकोबारायांना साष्टांग नमस्कार केला व मी देखील आज पासून तुमच्या सोबत येतो असे म्हटल्याबरोबर तुकोबारायांनी 'बाल-संतु' ची समजूत घातली व पाठी वरून मायेने हात फिरवित सांगितले बाळ संतु, संसार करून परमार्थ साधायचा असतो हे तुकोबारायांचे वाक्य गुरु-प्रसाद समजून संताजी महाराजांनी तुकोबारायांना साष्टांग अभिवादन केले. आणि आपल्या माता-पित्यां समवेत घरी परतले इथून पुढे संताजी महाराज भगवद भक्त झाले खऱ्या अर्थाने विठ्ठल भक्त झाले उभ्या आयुष्यात एकही क्षण वाया जाऊ न देता त्यांनी अभंग रचना रचायला सुरुवात केली त्यांच्या प्रसिद्ध अभंगा पैकी मला ज्ञात असलेल्या अभंगाच्या ह्या दोन ओळी *चारिता गोधने तुकोबांचे लिहिले अभंग आम्हां जाहले येणे एका तेलिया कारणे* अशी अभंग रचना लिहीत असताना संताजी महाराजांचे अध्यात्मिक ज्ञान वाढत गेले! त्यांनी स्वतः
*"तैलसिंधू" व "शंकर दीपिका* नावाचे दोन ग्रंथ लिहिले आणि मग ते तुकाराम महाराजांच्या सोबत किर्तनाला जायला लागले व ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे कीर्तन असायचे त्या ठिकाणी तुकाराम महाराज अभंगा द्वारे कीर्तन करत असताना श्री संत संताजी महाराज ते अभंग टिपून घ्यायचे म्हणजेच लिहायचे अशाप्रकारे तुकाराम महाराजांचे अभंग लिहीत लिहीत त्याची एक भली मोठी "गाथा" तयार झाली, तीच ही अभंग रूपाने आज रोजी उपलब्ध असलेली
"तुकाराम गाथा" होय. या "*तुकाराम-गाथा" चे लेखक हे श्री संत संताजी महाराज आहेत हे सांगताना छाती अभिमानाने फुलून येते*" इतक्या महत् प्रयासाने लिहून तयार केलेली अभंग रचना एका रामेश्वर भटा ने पवित्र इंद्रायणी नदी पात्रामध्ये फेकून दिली. त्यामुळे तुकाराम महाराज "मना" ने खचले होते त्यांनी जेवण सोडले होते, काहीच खाजगीत नव्हते अन्न पाण्याचा त्यात केला होता अशावेळी संताजी महाराजांनी आपल्या गुरूला वचन दिले देवा मी इतक्या सहज पणे ही गाथा नष्ट होऊ देणार नाही तुम्ही काही काळजी करू नका! *मला ज्ञात असलेल्या अभंगाची रचना मी पुन्हा लिहून काढतो आणि तुमच्या स्वाधीन करतो असे म्हटल्यावर तुकोबारायांना हर्ष झाला.* आणि संताजी महाराजांनी आठवत आठवत अभंग लिहायला सुरुवात केली *हाताचा पाळणा आणि नेत्री ची ज्योत प्रज्वलीत* करून संताजी महाराजांनी संपूर्ण अभंग गाथा लिहून काढली. आणि तुकोबारायांच्या स्वाधीन केली यावेळी तुकोबारायांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आणि तेव्हापासून संताजी महाराज तुकाराम महाराजांचे अत्यंत प्रिय असे शिष्य झाले. अशाप्रकारे संताजी महाराजांनी १ "तुकाराम-गाथा" २"तैलसिंधू" आणि ३ "शंकर दीपिका" हे तीन महाकाव्य त्यांनी लिहिले आहेत व जगाच्या स्वाधीन केले एकाच जन्मात तीन ग्रंथ लिहिणारा संत असा श्री संताजी महाराजांचा प्रामुख्याने उल्लेख केल्या जातो आणि म्हणूनच त्यांचे *सोनवणे हे आडनाव बदलून जग-नाडे म्हणजेच जग न नाडे असे करण्यात आले* संताजी महाराजांचे वंशज आज ही चाकणला वास्तव्यास आहेत. आणि हो राजा दशरथाच्या रथाचे चाक याच ठिकाणी निखळून पडले होते म्हणून या गावाला चाकण हे नाव पडले आहे. असो! संताजी महाराजांचा जन्म हा चाकणला झाला असला तरी त्यांचे अध्यात्मिक कार्य हे साऱ्या विश्वात आहे संताजी महाराजांची समाधी *श्रीक्षेत्र सदुंबरे तालुका मावळ जिल्हा पुणे येथे आहे* दरवर्षी येथे
*"श्रीं चा जन्मोत्सव" व यात्रा महोत्सव साजरा करण्यात येतो* तसेच महाराष्ट्रातील *सर्व धार्मिक स्थळे श्री संत संताजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करतात.* त्याचप्रमाणे वाशिम जिल्ह्यातील *( ऋषीवट-धाम ) रिसोड नगरीत 1997 पासून श्री संत संताजी महाराजांची भव्य मिरवणूक पालखी सोहळा हर्षोल्हासात साजरा करण्यात येतो.* 🌹🙏🙏🌹

👇 लेखक:-
*ज्ञानेशप्रसाद,*
*"श्री संताजी निवास"*
संवाद :- 9923230821
🙏🙏

15/12/2025

#फुगेनाही
मूर्खपणाचा फुगेबहार....
©️®️अमृता खंडेराव.
वाढदिवस किंवा कुठलाही विशेष कार्यक्रम करताना आजकाल फुग्यांची सजावट करण्याची जोरदार पद्धत आली आहे. मागच्या महिन्यात मी एका लहान मुलाच्या वाढदिवसाला गेले होते. तिथे शेकडो फुग्यांची सजावट केली होती. दुसऱ्या दिवशी त्या फुग्यांचे गुच्छ त्यांनी घराबाहेर फेकून दिले. लग्नकार्यात तर संपूर्ण परिसर आणि स्टेज हजारो फुगे लावून सजवले जाते.

फुग्यांचे मुख्यत्वे चार प्रकार पडतात.
१. लँटेक्स बलून
२. फाँईल मायलर बलून
३. हॉट एअर बलून
४. स्पेशालिटी बलून

लँटेक्स बलून नैसर्गिक रबरामध्ये रंग आणि काही पदार्थ घालून तयार केले जातात. त्यातील कंपोझिशनुसार त्याचे डीग्रेडेशन होण्यासाठी काही महिन्यांपासून चार वर्षांपर्यंत वेळ लागू शकतो. त्याचे तुकडे पडून ते निसर्गात तसेच साठून राहू शकतात.

फाँईल बलून नायलॉन वर मेटॅलिक कोटिंग करून तयार केले जातात आणि हे अजिबात बायोडिग्रेडेबल नसतात. यांचे 100 वर्षांपर्यंतसुद्धा विघटन होत नाही. म्हणजे तुमच्या एक दिवसाच्या हौसेसाठी तुम्ही पृथ्वीचे शंभर वर्षाचे काम वाढवून ठेवणार...

हॉट एअर बलून लाईटवेट नायलॉनपासून तयार होतात. तंबू किंवा मोठी पाकिटे बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉनपासून हे फुगे तयार होतात तर स्पेशल बलून फुगे पॉलीक्लोरोप्रेनपासून तयार केले जातात.

विशेषतः जेव्हा ते सोडले जातात तेव्हा फुगे पर्यावरणासाठी हानिकारक असतात. फुग्यांपासून
धोकादायक कचरा बनतो. ज्यामुळे वन्यजीव (पक्षी, कासव, सागरी सस्तन प्राणी यांच्या अन्नातून फुगे पोटात गेले तर त्यांच्यासाठी फार धोकादायक असते. प्राण्यांनी गिळलेल्या फुग्यामुळे त्यांच्यामध्ये जीवघेणे अंतर्गत अडथळे निर्माण होतात‌.

फुगे स्वस्त आहेत म्हणून सजावटीसाठी वापरले जातात परंतु ते पर्यावरणासाठी किती मोठ्या प्रमाणावर हानिकारक आहे याचा विचार केला जात नाही. फुग्यांऐवजी पाने-फुले वापरली तर ती सजावट निसर्गात पुन्हा कुजून जाईल आणि तिचा पर्यावरणाला धोका होणार नाही.

कुणीतरी एक मूर्ख चुकीची पद्धत सुरू करतो आणि सगळे मूर्ख रांगेने ती अमलात आणायला सुरू करतात. इथे सुशिक्षित आणि अशिक्षित सगळे सारखेच मूर्खपणाच्या आहारी जातात. बऱ्यावाईटाचा कोणीच विचार करत नाही.

भारतीय सुशोभन पद्धतीत फुगे वापरण्याची प्रथा नव्हती आणि नाही. भारतीय सुशोभन पर्यावरणपूरक आहे. पाने, फुले, डहाळ्या, धान्य, रांगोळ्या वापरून आपण सजावट करत आलो आहोत. आंब्याच्या पानांची तोरणे, केळीचे खांब आणि सोपटे, गवत, आंब्याच्या डहाळ्या, कागदी पताका लावून सजावट करण्याची भारतीय पद्धत सर्वात उत्तम आहे कारण या पद्धतीत वापरले जाणारे साहित्य विघटनशील आहे. ते पर्यावरणाला कसलाही धोका पोहोचवत नाही.

आपण सजावटीसाठी जी वस्तू वापरतो तिचे विघटन होत आहे की नाही याचा विचार केला पाहिजे. फेकून दिलेले फुगे नंतर मातीमध्ये, जलस्त्रोतांमध्ये अडकून पडतात. फॉइल फुगे तुटत नाहीत, तर लँटेक्स फुगे प्लास्टिकच्या तुकड्यांमध्ये विघटित होतात जे मायक्रोप्लास्टिक्स बनतात, माती आणि पाणी प्रदूषित करतात.

कुणाचीही नक्कल करण्यापूर्वी पर्यावरणाचा आधी विचार केला पाहिजे. उगीचच कुणीतरी सरी घातली म्हणून आपण दोरी घालण्यात अर्थ नाही. नवीन पिढीसाठी आपण आधीच प्रचंड प्रदूषित जमीन पाणी हवा निर्माण करून ठेवली आहे. त्यात वेगवेगळ्या चुकीच्या पद्धती वापरून आणखी भर घालून ठेवू नये.

प्रदूषणाचा महाराक्षस सर्व बाजूंनी पृथ्वीला वेढत आहे त्यात आता ही फुगेबहार आली आहे. आपल्या क्षणिक हौसेसाठी आपण एवढे मोठे प्रदूषण निर्माण करून ठेवत आहोत याचे सुशिक्षित लोकांना तरी भान आहे का?
©️®️अमृता खंडेराव.

(ही पोस्ट सर्वांनी शेअर केली पाहिजे.)

अगदी खरे...
पर्यावरण नाश म्हणजे स्वतः बरोबर आपल्या पुढील पिढीच्या आरोग्याची देखील जबरदस्त हानी...😠

Shri Ramesh Kumar Goyal Spl DGT MH LSA visited DKTE's Textile and Engg Institute Ichalkaranji (Kolhapur SSA) and interac...
13/12/2025

Shri Ramesh Kumar Goyal Spl DGT MH LSA visited DKTE's Textile and Engg Institute Ichalkaranji (Kolhapur SSA) and interacted with Faculties & Students for 5G Use Case Lab. The institute organised a Faculty Development Workshop (FDP) on 5G Network & Security from 8th to 12th December -25 wherein Valedictory Function speech and Certificate of participation was given by Goyal Sir on 12th December.

On this occasion, Sanchar Mitras of the Institute were handed over DoT logo Caps (hats).

Under the guidance of Shri Ramesh Kumar Goyal, Special DGT MH LSA, team of Technology vertical visited the SPPU Research...
06/10/2025

Under the guidance of Shri Ramesh Kumar Goyal, Special DGT MH LSA, team of Technology vertical visited the SPPU Research Park Foundation at Pune University on 6.10.2025 to review ongoing research activities and explore potential areas of collaboration in the field of advanced telecommunications and ICT. Dr. Arvind Shaligram (CEO) of the SPPU Research Park Foundation explained an enabling ecosystem for innovation, start-ups, and academia–industry partnerships. The Research Park is actively working on applied research and incubation support for different field startups like Basic science, Agriculture, Social Science, Sports, Education content development, Health science etc.

Team visited affordable agriculture Lab, Center for Industry.4 Lab (C4I4 lab), Center for research innovation and commercialization lab etc. Opportunities for collaboration with DoT in the areas of 5G, 6G and Quantum computing technology were discussed. The visit provided valuable insights into the innovation ecosystem at SPPU Research Park Foundation and DoT MH LSA expressed intent to maintain active engagement to develop a roadmap for future cooperation in the telecom domain.

।। राष्ट्रीय हिन्दी दिवस ।।हिन्दी दिवस की आपस भी को हार्दिक बधाई!_हिन्दी हमारी एकता का आधार और अस्मिता की प्रहरी है। समस...
14/09/2025

।। राष्ट्रीय हिन्दी दिवस ।।

हिन्दी दिवस की आपस भी को हार्दिक बधाई!_
हिन्दी हमारी एकता का आधार और अस्मिता की प्रहरी है। समस्त भारतीयों को एक सूत्र में पिरोती हमारी परंपराओं की संवाहिका हिन्दी हमें हमारी जड़ों से जोड़ती है।

आइए, हिंदी के अधिकाधिक प्रयोग व वैश्विक प्रसार हेतु संकल्पित हों, इसके विकास में भागीदार बनें और इस युग की सबसे प्रभावी भाषा बनाएं।

जय हिंदी जय भारत

24/08/2025

The Train Stops
only for 20 seconds
and they need to Load
a lot of bunches.
The - impossible 'becomes possible.'
Because these Non MBA women put into practice the principles of
- Target setting
- Planning & Ex*****on
- Coordination
- Collaboration
- Trust
- Team Work and it succeeds

Great प्रेसिसिओन. 👏This video is a powerful testament to the incredible capabilities of dedicated individuals, irrespective of their educational backgrounds.

Address

Amravati

Alerts

Be the first to know and let us send you an email when Friends of Ujwal Gulhane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Friends of Ujwal Gulhane:

Share